शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

Maharashtra Election 2019; गोंदिया जिल्ह्यात तरुण चेहऱ्याला संधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:20 IST

राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.

ठळक मुद्दे केवळ प्रचारक म्हणूनच वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराचे भवितव्य निश्चित करण्यात तरुण मतदारांची महत्त्वाची भूमिका असते. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील तरुण मतदारही येथील राजकारण्यांचे भवितव्य ठरवतील. त्यामुळे सर्वच मार्गाने तरुण मतदारांना आपआपल्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहेत. मात्र या सगळ्या राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना थेट राजकारणात संधी देण्याबाबत त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.सर्वच राजकारण्यांना व राजकीय पक्षांना तरुणांची मते हवी आहेत. प्रचारासाठी तरुण कार्यकर्ते, तरुण पदाधिकारी हवे आहेत. मात्र थेट राजकारणामधील त्यांचा समावेश करण्यासाठी मात्र पक्ष उदासीन दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार इच्छुक असतांना या उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोपही तरुणांकडून होत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि नोकरी या सर्व प्रश्नांना हत्यार करुन त्याबाबत कार्यक्रम घेवून राजकीय पक्ष पुढे येतात. तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून निवडणूक जिंकतात.मात्र पुढील पाच वर्ष त्याची अंमलबजावणी कितपत होते हा देखील संशोधनाचा विषय आहे. तरीही तरुणांना राजकारण आणि राजकारणाविषयी आकर्षण कमी झालेले दिसून येत आहे. रोजगार, नोकरी याबाबत नेहमीच राजकारणी, राज्यकर्ते, राजकीय पक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. राजकारणासारख्या क्षेत्रात तरुणांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांबाबत मोठ्या प्रमाणात राजकारणांमध्ये उदासिनता आहे.निवडणुकीच्या तोंडावार तरुणांच्या बेरोजगारी, अशिक्षितपणा व गरीबीचा फायदा घेत निवडणुकीपुरता त्यांचा वापर करुन घेतला जातो. तरुणांचे ध्येय केवळ झेंडा हातात घेणारा, काहीसा उपद्रवीमूल्य असणारा आणि मौजमजा करण्यासाठी वेळ घालविणारा असे गृहीत धरुनच निवडणुकीसाठी तरुण वर्गाचा वापर केला जातो. राजकीय पोळ्या भाजण्यात मशगुल असणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी हे तरुणांच्या प्रश्नांचे भांडवल करतात शिवाय तेही कमी पडले तर जात, धर्म व आरक्षण अशा भावनिक मुद्यांवर हात घालून तरुणांचे डोके भडकविण्याचे काम केले जाते. काही राजकारणी धर्मांध संघटनाचे नेते हे त्यासाठी काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाही. ग्रामपंचायतीमध्ये एखादा सुशिक्षीत तरुणाने यायचे म्हटले की, राजकारण हे तुझे काम नाही, राजकारण करण्यापेक्षा आपले करिअर घडव असे फुकटचे सल्ले देऊन तरुणांना राजकारणापासून परावृत्त केले जाते. तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे. तरुण राजकारणांमध्ये आल्यास व त्यांना योग्य पाठबळ मिळाल्यास किंवा सकारात्मक दिशा मिळाल्यास त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळू शकेल. आजची तरुण पिढी ही केवळ सोशल मीडीयावर प्रतिक्रिया देणारी नसून ती संघटीत होऊ शकते. त्यामुळे या तरुणपिढीकडे राजकीय व सामाजिक परिवर्तनाची ताकत आहे. ती नाकारता येणार नाही. आजची तरुण पिढी ही विज्ञान युगात वावरणारी असल्याने ती देशाच्या भवितव्याबाबत गंभीर राहून अनेक अभिनव उपक्रम व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन राजकारण हे प्रगतीचे व्यासपीठ बनवू शकते.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019