शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

Maharashtra Election 2019; गोंदिया जिल्ह्यात तरुण चेहऱ्याला संधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:20 IST

राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.

ठळक मुद्दे केवळ प्रचारक म्हणूनच वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराचे भवितव्य निश्चित करण्यात तरुण मतदारांची महत्त्वाची भूमिका असते. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील तरुण मतदारही येथील राजकारण्यांचे भवितव्य ठरवतील. त्यामुळे सर्वच मार्गाने तरुण मतदारांना आपआपल्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहेत. मात्र या सगळ्या राजकारणाच्या रणधुमाळीत तरुणांना थेट राजकारणात संधी देण्याबाबत त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची संधी देण्यासह त्यांचे नेतृत्व कौशल्यावर विश्वास टाकण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षाने दाखविले नाही. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात तरुण चेहऱ्यांचा अभाव आहे.सर्वच राजकारण्यांना व राजकीय पक्षांना तरुणांची मते हवी आहेत. प्रचारासाठी तरुण कार्यकर्ते, तरुण पदाधिकारी हवे आहेत. मात्र थेट राजकारणामधील त्यांचा समावेश करण्यासाठी मात्र पक्ष उदासीन दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार इच्छुक असतांना या उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोपही तरुणांकडून होत आहे. तरुणांचे शिक्षण, रोजगार आणि नोकरी या सर्व प्रश्नांना हत्यार करुन त्याबाबत कार्यक्रम घेवून राजकीय पक्ष पुढे येतात. तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून निवडणूक जिंकतात.मात्र पुढील पाच वर्ष त्याची अंमलबजावणी कितपत होते हा देखील संशोधनाचा विषय आहे. तरीही तरुणांना राजकारण आणि राजकारणाविषयी आकर्षण कमी झालेले दिसून येत आहे. रोजगार, नोकरी याबाबत नेहमीच राजकारणी, राज्यकर्ते, राजकीय पक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. राजकारणासारख्या क्षेत्रात तरुणांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांबाबत मोठ्या प्रमाणात राजकारणांमध्ये उदासिनता आहे.निवडणुकीच्या तोंडावार तरुणांच्या बेरोजगारी, अशिक्षितपणा व गरीबीचा फायदा घेत निवडणुकीपुरता त्यांचा वापर करुन घेतला जातो. तरुणांचे ध्येय केवळ झेंडा हातात घेणारा, काहीसा उपद्रवीमूल्य असणारा आणि मौजमजा करण्यासाठी वेळ घालविणारा असे गृहीत धरुनच निवडणुकीसाठी तरुण वर्गाचा वापर केला जातो. राजकीय पोळ्या भाजण्यात मशगुल असणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी हे तरुणांच्या प्रश्नांचे भांडवल करतात शिवाय तेही कमी पडले तर जात, धर्म व आरक्षण अशा भावनिक मुद्यांवर हात घालून तरुणांचे डोके भडकविण्याचे काम केले जाते. काही राजकारणी धर्मांध संघटनाचे नेते हे त्यासाठी काहीही करण्यास मागे पुढे पाहत नाही. ग्रामपंचायतीमध्ये एखादा सुशिक्षीत तरुणाने यायचे म्हटले की, राजकारण हे तुझे काम नाही, राजकारण करण्यापेक्षा आपले करिअर घडव असे फुकटचे सल्ले देऊन तरुणांना राजकारणापासून परावृत्त केले जाते. तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे. तरुण राजकारणांमध्ये आल्यास व त्यांना योग्य पाठबळ मिळाल्यास किंवा सकारात्मक दिशा मिळाल्यास त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळू शकेल. आजची तरुण पिढी ही केवळ सोशल मीडीयावर प्रतिक्रिया देणारी नसून ती संघटीत होऊ शकते. त्यामुळे या तरुणपिढीकडे राजकीय व सामाजिक परिवर्तनाची ताकत आहे. ती नाकारता येणार नाही. आजची तरुण पिढी ही विज्ञान युगात वावरणारी असल्याने ती देशाच्या भवितव्याबाबत गंभीर राहून अनेक अभिनव उपक्रम व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन राजकारण हे प्रगतीचे व्यासपीठ बनवू शकते.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019