शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

गोंदिया जिल्ह्यात चुकारे थकले शेतकरी अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:42 IST

जिल्ह्यात खरिप हंगामातील धान खरेदीला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही धान खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली नाही.

ठळक मुद्दे५२ कोटीची धान खरेदी २२ कोटीचे चुकारेनिधी अभावी अडचण

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरिप हंगामातील धान खरेदीला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही धान खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्रीे केलेल्या शेतकऱ्यांना महिनाभराचा कालावधी लोटूनही चुकारे मिळाले नाही. ३२ कोटी रु पयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून पुन्हा त्यांना सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.खरिप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. यंदा दोन्ही विभागातंर्गत एकूण शंभर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाने यंदा अ श्रेणीच्या धानाला १७७० तर सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धानाचे उत्पादन अधिक झाले आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १ डिसेंबरपर्यंत ३ लाख ११ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.तर आदिवासी विकास महामंडळाने दीड लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. धान खरेदी केंद्रावर अजूनही मोठ्या प्रमाणात धानाची आवक सुरू आहे. त्यामुळे मागील आठ दहा वर्षाच्या तुलनेत यंदा विक्र मी धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र त्या दृष्टीकोनातून शासनाची तयारी नसल्याचे चित्र आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ५४ कोटी रूपयांची धान खरेदी झाली असताना शेतकऱ्यांना केवळ २२ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. महिनाभरापासून ३२ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांनी सावकार व नातेवाईक व बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी धानाची लवकर मळणी करुन शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्र ी केली. तर काही शेतकऱ्यांनी आपली कौटूंबिक अडचण भागविण्यासाठी घाईघाईने धानाची विक्र ी केली. मात्र चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांना अजून उधार उसणवारी करून कर्जबाजारी होण्याची व सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.शासनाकडून निधी मिळण्यास उशीरजिल्हा माकेटिंग मार्केटिंग आणि आदिवासी विकास महामंडळाने शासकीय धान खरेदी केंद्रावर झालेल्या धान खरेदीचे चुकारे करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली.तसेच आठवडाभरापूर्वीच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १५ कोटी रुपयांच्या हुंड्या सुद्धा तयार करून पाठविल्या आहेत. मात्र शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे.

आनलाईन नोंदणीची अडचणशेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केल्यानंतर केंद्रावरील संबंधित कर्मचाऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मात्र खरेदी केल्यानंतर नोंदणी करण्यास विलंब होत असल्याने चुकारे देण्यास अडचण येत आहे. त्यातच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने चुकारे देण्याच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होत असल्याची माहिती आहे.

पूर्व नोंदणीतून तोडगाशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे तीन दिवसात मिळावे. यासाठी शेतकऱ्यांना धान विक्रीस आणण्यापूर्वी त्याची खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. त्यामुळे खरेदीचा अंदाज घेवून शासनाकडून तेवढी रक्कम मागविण्यास मदत होईल. या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सर्व धान खरेदी केंद्रावरुन आत्तापर्यंत ३ लाख ११ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. एकूण ५४ कोटी रुपयांची खरेदी झाली असून त्यापैकी २२ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना केले आहे.उर्वरित चुकारे निधी प्राप्त होताच करण्यात येईल.- नानासाहेब कदम, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरी