शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:58 IST

गोंदिया जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही वेगळी ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करणे टाळले असून शेवटच्या दिवशी ‘एबी’ फार्म देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन वेळेवर फोडाफोडीचे राजकारण सुरु होणार,अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना सतावत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि.२७) उमेदवारी अर्ज दाखल करण्य्स सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदारांनी पक्षातर केले असून ते ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राजकारणातील बरेच घोडे मागे पुढे होण्याची शक्यता आहे. अशात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील आपले उमेदवार व विद्यमान आमदारांना पहिल्या यादीतच स्थान देऊन टाकले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अधिक वाढला आहे.काँग्रेस-राका मधून जोरदार आऊट गोर्इंग सुरु असून निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होवू नये, यासाठी सावध पवित्रा घेतला असल्याची माहिती आहे. तर भाजपमध्ये आयात केलेल्या इतर पक्षातील नेत्यांची गर्दी वाढली असल्याने या पक्षातील निष्ठावान कार्यकर्तेही दुखावले असून काही प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचे स्फोटात रुपांतर झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात उमेदवारीचे चित्र ३ तारखेलाच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची होणार दमछाकविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात एकाच दिवशी २१ तारखेलाच मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला काही दिवसांचा अवधी मिळणार असल्याने स्टार प्रचारकांची चांगलीच दमछाक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ४ तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. ५ तारखेला नामनिर्देशनपत्राची छाननी व ७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. २१ तारखेला मतदान व २४ तारखेला मत मोजणी होणार आहे. यामुळे ८ तारखेपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. अवघ्या १२ दिवसांत उमेदवारांना अवघा मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. निवडणूक कालावधीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, मनसे आदी पक्षांचे अनेक स्टार प्रचारक प्रचार करताना दिसणार आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019