शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:58 IST

गोंदिया जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही वेगळी ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करणे टाळले असून शेवटच्या दिवशी ‘एबी’ फार्म देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन वेळेवर फोडाफोडीचे राजकारण सुरु होणार,अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना सतावत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि.२७) उमेदवारी अर्ज दाखल करण्य्स सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदारांनी पक्षातर केले असून ते ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राजकारणातील बरेच घोडे मागे पुढे होण्याची शक्यता आहे. अशात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील आपले उमेदवार व विद्यमान आमदारांना पहिल्या यादीतच स्थान देऊन टाकले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अधिक वाढला आहे.काँग्रेस-राका मधून जोरदार आऊट गोर्इंग सुरु असून निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होवू नये, यासाठी सावध पवित्रा घेतला असल्याची माहिती आहे. तर भाजपमध्ये आयात केलेल्या इतर पक्षातील नेत्यांची गर्दी वाढली असल्याने या पक्षातील निष्ठावान कार्यकर्तेही दुखावले असून काही प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचे स्फोटात रुपांतर झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात उमेदवारीचे चित्र ३ तारखेलाच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची होणार दमछाकविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात एकाच दिवशी २१ तारखेलाच मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला काही दिवसांचा अवधी मिळणार असल्याने स्टार प्रचारकांची चांगलीच दमछाक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ४ तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. ५ तारखेला नामनिर्देशनपत्राची छाननी व ७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. २१ तारखेला मतदान व २४ तारखेला मत मोजणी होणार आहे. यामुळे ८ तारखेपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. अवघ्या १२ दिवसांत उमेदवारांना अवघा मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. निवडणूक कालावधीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, मनसे आदी पक्षांचे अनेक स्टार प्रचारक प्रचार करताना दिसणार आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019