शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:58 IST

गोंदिया जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही वेगळी ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करणे टाळले असून शेवटच्या दिवशी ‘एबी’ फार्म देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन वेळेवर फोडाफोडीचे राजकारण सुरु होणार,अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना सतावत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि.२७) उमेदवारी अर्ज दाखल करण्य्स सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदारांनी पक्षातर केले असून ते ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राजकारणातील बरेच घोडे मागे पुढे होण्याची शक्यता आहे. अशात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील आपले उमेदवार व विद्यमान आमदारांना पहिल्या यादीतच स्थान देऊन टाकले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अधिक वाढला आहे.काँग्रेस-राका मधून जोरदार आऊट गोर्इंग सुरु असून निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होवू नये, यासाठी सावध पवित्रा घेतला असल्याची माहिती आहे. तर भाजपमध्ये आयात केलेल्या इतर पक्षातील नेत्यांची गर्दी वाढली असल्याने या पक्षातील निष्ठावान कार्यकर्तेही दुखावले असून काही प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचे स्फोटात रुपांतर झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात उमेदवारीचे चित्र ३ तारखेलाच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची होणार दमछाकविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात एकाच दिवशी २१ तारखेलाच मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला काही दिवसांचा अवधी मिळणार असल्याने स्टार प्रचारकांची चांगलीच दमछाक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ४ तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. ५ तारखेला नामनिर्देशनपत्राची छाननी व ७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. २१ तारखेला मतदान व २४ तारखेला मत मोजणी होणार आहे. यामुळे ८ तारखेपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. अवघ्या १२ दिवसांत उमेदवारांना अवघा मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. निवडणूक कालावधीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, मनसे आदी पक्षांचे अनेक स्टार प्रचारक प्रचार करताना दिसणार आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019