शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

Vidhan Sabha Election 2019; गोंदिया जिल्ह्यात उमेदवारांच्या दलबदलाने राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 11:58 IST

गोंदिया जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही वेगळी ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहत असताना सर्वच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही धोका पत्करणे टाळले असून शेवटच्या दिवशी ‘एबी’ फार्म देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन वेळेवर फोडाफोडीचे राजकारण सुरु होणार,अशी भिती सर्वच राजकीय पक्षांना सतावत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (दि.२७) उमेदवारी अर्ज दाखल करण्य्स सुरुवात झाली. ४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून शेवटच्या दोन दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदारांनी पक्षातर केले असून ते ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राजकारणातील बरेच घोडे मागे पुढे होण्याची शक्यता आहे. अशात भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील आपले उमेदवार व विद्यमान आमदारांना पहिल्या यादीतच स्थान देऊन टाकले आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पत्ते अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अधिक वाढला आहे.काँग्रेस-राका मधून जोरदार आऊट गोर्इंग सुरु असून निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होवू नये, यासाठी सावध पवित्रा घेतला असल्याची माहिती आहे. तर भाजपमध्ये आयात केलेल्या इतर पक्षातील नेत्यांची गर्दी वाढली असल्याने या पक्षातील निष्ठावान कार्यकर्तेही दुखावले असून काही प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे या असंतोषाचे स्फोटात रुपांतर झाल्यास निवडणुकीत याचा फटका बसू शकतो. त्यामुळे सबुरीने घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात उमेदवारीचे चित्र ३ तारखेलाच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची होणार दमछाकविधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात एकाच दिवशी २१ तारखेलाच मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला काही दिवसांचा अवधी मिळणार असल्याने स्टार प्रचारकांची चांगलीच दमछाक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ४ तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. ५ तारखेला नामनिर्देशनपत्राची छाननी व ७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. २१ तारखेला मतदान व २४ तारखेला मत मोजणी होणार आहे. यामुळे ८ तारखेपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. अवघ्या १२ दिवसांत उमेदवारांना अवघा मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. निवडणूक कालावधीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, मनसे आदी पक्षांचे अनेक स्टार प्रचारक प्रचार करताना दिसणार आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019