शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

गोंदिया जिल्ह्यात तंटामुक्तीचे हुंडाबंदीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 10:38 IST

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यापासून पहिल्या दोन वर्षात जिल्ह्यातील समित्यांनी उपवराला मुलीच्या मंडळीकडून हुंडा मागू देणार नाही, असा पवित्रा घेत दोन वर्ष काही समित्यांनी चांगले कार्य केले. लग्नात उपवर मागत असलेल्या हुंड्याकडेही तंटामुक्त समित्यांनी लक्ष दिले आहे. परंतु शासनानेच या तंटामुक्त गाव मोहीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महात्मा ...

ठळक मुद्देवाढू लागली उदासिनताविधवा परित्यक्तांना आधार वाऱ्यावर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू झाल्यापासून पहिल्या दोन वर्षात जिल्ह्यातील समित्यांनी उपवराला मुलीच्या मंडळीकडून हुंडा मागू देणार नाही, असा पवित्रा घेत दोन वर्ष काही समित्यांनी चांगले कार्य केले. लग्नात उपवर मागत असलेल्या हुंड्याकडेही तंटामुक्त समित्यांनी लक्ष दिले आहे. परंतु शासनानेच या तंटामुक्त गाव मोहीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे  हुंडाबंदी मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा ताण व पोलिसांचा वाढता भार पाहून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहीमेअंतर्गत गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून नविन तंटे उद्भवणार नाही. याशिवाय गावातील अनिष्ठ रूढी, रितीरिवाज व परंपरा यांचा नायनाट गाव गाड्यातून करावा अशी समज समित्यांना देण्यात आली होती. गावात असलेल्या विधवा, परित्यक्ता व दुर्बल महिलांचे संरक्षण व्हावे, त्याच्यावर अन्याय होऊ नये याची खबरदारी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी घ्यायला हवी, असे शासन निर्णयात नमूद केले. समाजात भ्रूणहत्येचे वाढलेले प्रमाण पाहून त्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविला होता.तंटामुक्त समित्यांनी पुरस्कार रकमेतून ५०० रुपये प्रति महिलेला देऊन मुलींना जन्म देणाºया मातांना कन्यारत्न भेट तर नवविवाहिताना माहेर व सासरभेट देण्यात आली. परंतु गावातील परित्यक्ता व विधवा महिलांच्या उत्थानासाठी तंटामुक्त समित्यांनी वाखाणण्याजोगे कार्य केले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तंटामुक्तीने पाऊल उचलले होते. परंतु आता तंटामुक्त समित्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदावर ३० टक्के महिला असाव्यात असेही सुचविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.पैसा, वेळ व त्रासाची बचततंटामुक्त मोहीमेमुळे गावातील तंटे गावातच सांमजस्याने सोडविले जात असल्याने वाद घालणाऱ्या दोन्ही पक्षाच्या लोकांच्या पैशाची बचत झाली. न्यायालयात चकरा मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत झाली. आर्थिक त्रास व मानसिक त्रास याचीही नागरिकांची बचत झाली. सोबतच पोलीस यंत्रणेचा व न्यायालयाच्या डोक्यावरील कामाचा बोझा कमी झाला. वेळ, पैसा व त्रास वाचविण्यासाठी तंटामुक्त मोहीम रामबाण उपाय असल्याचे मत समिक्षकांनी शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.विनीयोगाचे काय झाले?तंटामुक्त मोहिमेच्या पुरस्कार मिळालेल्या गावांनी पुरस्कार रकमेचा विनियोग कशाप्रकारे केला. त्याचे लेखापरिक्षण करून अहवाल शासनाला पाठविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात यावे, असे पत्र मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निर्गमीत केले होते. खंडविकास अधिकाऱ्यांनी लेखा परीक्षण केल्यानंतरच अहवाल शासनाकडे सादर करावा, असे आवाहन केले होते परंतु त्याचे काय झाले कळलेच नाही.