शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:23 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.

ठळक मुद्देरतनलाल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दूध असून जो हे दूध पिणार तो गुर्गुरल्याशिवाय राहणार असे सांगितले होते. मात्र आता देशातील शिक्षण व्यवस्था ही केवळ जी सर म्हणणारी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रो.डॉ.रतनलाल यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे रविवारीे (दि.१४) येथील प्रशासकीय भवनासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने सुनील बौध्द, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.निमगडे, आप चे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मोदी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, मंगला नंदेश्वर, अमित भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचीे सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन करण्यात आली. प्रो.रतनालाल म्हणाले, १३ पार्इंट रोस्टरच्या विरोधातील लढाई जरी आपण जिंकली असली तरी अशी लढाई आपल्याला वांरवार लढावी लागू शकते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा सन्मान करीत असल्याचे ढोंग सरकार करीत असून असे ढोंगी सरकार सत्तेवर राहिल्यास वांरवार लढा उभारावा लागेल. त्यामुळेच आता शिक्षण व्यवस्थेला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. मागील वेळेस जेएनयू आणि विद्यापिठात वाद निर्माण करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा होवू नये यासाठी रस्तावर उतरुन लढा देण्यासाठी तयार राहा असे आवाहन देखील त्यांनी केले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विलास राऊत यांनी केले तर आभार समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार यांनी केले.