शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

आदिवासींना विकासाच्या मार्गावर चालविणे हेच ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:29 IST

गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियातील नक्षलवाद्यांचा कुटील डाव फसला आणि ती स्फोटके जप्त केलीत.

ठळक मुद्देशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन नसून गडचिरोली सारखाच संवेदनशिल जिल्हा आहे. गडचिरोलीत भूसुरूंगस्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडविण्यात आले. असाच भूसुरूंगस्फोट गोंदियातही घडविण्याचे मनसुबे नक्षल्यांचे होते.परंतु ऐनवेळी पोलिसांच्या सर्तकेने गोंदियातील नक्षलवाद्यांचा कुटील डाव फसला आणि ती स्फोटके जप्त केलीत.गोंदिया जिल्ह्याच्या आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अडीच महिन्यापूर्वी रूजू झालेले जालींदर नालकूल यांनी गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी आदिवासींना विकासाच्या मार्गावर नेणाºया विकास योजनांचा लाभ मिळवून देण्याचा चंग बांधला. लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास चर्चा केली.२०१४ ला पोलीस दलात रूजू झालेले जालींदर नालकूल यांची नाशिक येथे ट्रेनिंग झाली. पहिली पोस्टींग नागपूर ग्रामीण येथे परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून एक वर्ष, त्यानंतर रायगड व आता आमगाव उपविभागाचे ते उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. १५ मार्च २०१९ ला रूजू झालेले नालकूल यांनी नक्षलवाद्यांची मुसके आवळण्यासाठी त्यांना जेवण देणाºया आदिवासी जनतेला विश्वासात घेण्याचे काम सुरू केले.गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी जनता आधी पोलीसांना माहिती देत नव्हती. पोलीस गावात आले की लोक दार बंद करून घरात राहायचे. परंतु महाराष्टÑ शासनाने आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस विभाग यांच्यात समन्वय साधला गेला. तंटामुक्त मोहीम ही पोलीस व नक्षलग्रस्त भागातील जनता यांच्या समन्वय साधणारा दुवा झाली. नालकूल म्हणाले विकासापासून जनता दूर असली की त्यांना विविध आमिष देऊन नक्षलवादी आपल्या चळवळीकडे वळवितात. त्यामुळे नक्षलवाद्यांना कुणीही सहकार्य करू नये यासाठी त्या जनतेला विकासाच्या समृध्द मार्गावर चालण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा थेट फायदा करून देण्यासाठी पोलीस विभाग तत्पर असल्याचे म्हणाले. निराधार, वृध्दांना, शेतकऱ्यांना व बेरोजगारांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचा विकास करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांना पोहचवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचा माणस बांधला आहे. नक्षलवाद्यांचा खडतर मार्ग जीवन उध्वस्त करणारा आहे.सद्यास्थितीत सगळे लोक प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षल चळवळीत असणारे लोकही चळवळ सोेडून आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेत आहेत. लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात येणाºयासाठी शासनाने नक्षल आत्मसमर्पण योजना अमंलात आणली. हिंसा करून काहीच साध्य होत नाही. आदिवासी जनतेने आपल्या समस्या, अडचणी यावर पोलिसांसमोर खुला संवाद करणेगरजेचे असल्याचे नालकूल म्हणाले. ‘झुंज करूणी का शिणता, रक्त पिपासू का बनता, असा आर्त सवाल करीत शांततेच्या आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी नक्षलवाद्यांनीही मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी मुलाखतीतून केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस