शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:03 IST

तिरोडा आणि गोंदिया तालुक्याच्या टोकावर असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा. या गावाला तहसील कार्यालय व पंचायत समिती देवून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या २२ वर्षांपासून केली जात आहे.

ठळक मुद्दे२२ वर्षांपासून रखडली मागणी : कृती समितीचे आमदारांना निवेदन

ऑनलाईन लोकमतकाचेवानी : तिरोडा आणि गोंदिया तालुक्याच्या टोकावर असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा. या गावाला तहसील कार्यालय व पंचायत समिती देवून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या २२ वर्षांपासून केली जात आहे. मात्र आजही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. आता या मागणीच्या पूर्ततेसाठी आमदार विजय रहांगडाले यांना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.इंग्रज राजवटीत जनतेच्या सुविधेकरिता ९६ गावांच्या मध्यभागी दवनीवाडा येथे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिरोडा व गोंदिया तालुक्यांच्या ठिकाणी जनतेला आपले कामे करण्यासाठी त्रास व वेळ अधिक लागत होते. त्यामुळे दवनीवाडा येथे तहसील व पं.स. कार्यालय स्थापित करुन तालुक्याचा दर्जा द्यावा. याकरिता सर्व राजकीय पक्षांचे नामदार, खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला होता.दवनीवाडा येथे तहसील कार्यालय व पं.स. कार्यालय किती गरजेचे आहे, हे मुंबई व नागपूर विधानसभेच्या वेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व करुन समजविण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व इतर मंत्र्यांनी तहसीलचा दर्जा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.आमदार रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनात तालुका व पंचायत समिती निर्माण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भंडारा जिल्हा परिषदेच्या सभेत (ठराव क्र. २३ दि.५ नोव्हेंबर १९९६) पहिला ठराव घेण्यात आला होता. पंचायत समिती तिरोड्याच्या सभेत (ठराव क्र. १२ दि. ६ जून १९८५) दुसरा ठराव घेण्यात आला होता. तसेच पंचायत समिती गोंदिया येथे (ठराव क्रमांक १३ दि. ६ सप्टेंबर २००५) तिसरा ठराव घेण्यात आला होता.तिन्ही ठराव सर्वानुमते पारित करुन शासनास देण्यात आले होते. राज्यात नवीन तालुके व पं.स. तयार करताना प्रत्येक वेळी मागणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, आजही त्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. निवेदनानुसार, महाराष्टÑ शासनाने जिल्हाधिकारी गोंदियामार्फत माहिती व तालुका तयार करण्याकरिता आवश्यक तपशील मागितला. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती व तपशील पाठविला. तरीपण आजपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांना १८ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले. या वेळी सरपंच नरहरप्रसाद मस्करे, राजेश उरकुडे, निरज सोनेवाने, बंठी श्रीबांसुरी, भैयालाल सूर्यवंशी, रोशन चौधरी, शफी शेख, नेहरू उपवंशी, मंडेले व स्वरूप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.पालघर जिल्ह्याची निर्मिती, मग दवनीवाडा का नाही?१ आॅगस्ट २००२ पासून लोकसभा, विधानसभा संघाच्या परिसिमनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या प्रशासकीय घटकांची पुनर्रचना करुन नवीन प्रशासकीय घटक निर्माण करण्यास केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या परिसिमन आयोगाची बंदी घातल्याने दवनीवाडा नवीन तालुका निर्माण करता येत नाही, असे पत्र दिले. मात्र या उलट २०११ ते २०१२ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व दवनीवाड्याच्या प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला. त्यामुळे या पक्षपातबद्दल जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तारांकित प्रश्नातून मुद्दा उचलणारआमदार विजय रहांगडाले येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे दवनीवाडा तालुक्याचा प्रश्न उपस्थित करणार आहेत. तसेच जनतेला न्याय मिळवून देणार, असे आश्वासन दिल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले. यापूर्वीसुद्धा दवनीवाडा तालुक्यासाठी प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते, असे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले. तारांकित प्रश्नासंबंधी पत्र मुख्यमंत्री यांना (पत्र जा.क्र. विभर/ति६४/५११/२०१८ दि. १८ फेब्रुवारी २०१८) पाठविण्यात आला आहे.