शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:17 IST

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतमजूर युनियनची मागणी : उपविभागीय कार्यालयावर मोर्चा व धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाच्यावतीने उपविभागीय अधिकारी रविंद्र राठौड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वन अधिकारी कायदा २००६ ते २००८ अंतर्गत दाखल शेतीच्या जमिनीवर अतिक्रमणधारकांना तत्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे व ज्यांना पट्टे देण्यात आले त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, मनरेगा कायद्यांतर्गत ग्रामीण बेरोजगारांना एक कुटूंबातील दोन लोकांना काम देण्यात यावे, कामात ४०० रुपये मजूरी देण्यात यावी व प्रत्येक आठवड्यात वेतन देण्यात यावे, ग्रामीण बेरोजगारांचे पलायन थांबविण्यात यावे. प्रत्येक गरजू कुटूंबाला वाढत्या महागाईला पाहता ५ लाख रुपयांचे घरकूल बनवून देण्यात यावे, निराधारांसाठी मानधन नको कायदा करण्यात यावा, १००० रुपये मानधन दरमहा देण्याची चोख व्यवस्था करण्यात यावी व निराधाराची ६५ वर्ष ऐवजी ६० वर्षाची अट निश्चित करण्यात यावी, सर्व रेशनकार्डधारकांंना ३५ किलो रेशन स्वस्त दरात देण्यात यावे, दुकान गाळे वाटपात झालेल्या भ्रष्ट कारभाराची तत्काळ चौकशी व दोषीवर कडक कार्यवाही करावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर, राणी दुर्गावती चौकात जाहीर सभा घेण्यात आली. त्यात सर्वप्रथम काश्मिरच्या पुलवामामध्ये झालेल्या आंतकवादी हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. नंतर सभेला शेखर कनोजिया शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव यांनी संबोधीत केले. अध्यक्षस्थानी बाबुराव राऊत होते.संचालन समीर उजवणे यांनी केले. आभार संजय लांडेकर यांनी मानले. मोर्चा आंदोलनासाठी शकील शेख, प्रेमदास चौरे, रेखा ताराम, सूरजा सयाम, पुष्पा परतेकी, जाफर रहिम शेख, लालदास चवरे, मोतीराम रहिले यांच्यासह युनियनच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणagricultureशेती