शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रब्बी धानपिकाला धरणाचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:26 IST

इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांवर अन्याय आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे वडेगाव वितरीकेपर्यंत ३९०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन द्यावे असे निवेदन येत्या २ ते ३ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.यासंदर्भात धाबेटेकडी-आदर्श येथील कृषी विद्यालयात शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.सदस्य किशोर तरोणे, राकॉचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सरपंच दिपक सोनवाने, विनायक मस्के, माणिक सोनवाने, बुराडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागावर यावेळी तिव्र असंतोष व्यक्त केला. काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी केवळ अर्जुनी-मोरगाव पर्यंत पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला.३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत धानपिकाला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आम्ही कडधान्याचा विचार न करता धान पीक लागवडीसाठी मशागत केली. मात्र आता केवळ २१०० हेक्टरला अर्जुनी-मोरगाव पर्यंत सिंचन होईल असा फतवा काढल्यामुळे आमची फसगत केली असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. एकतर शेतीला पाणी द्यावे अन्यथा आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ही बाब मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.अन्याय सहन करणार नाही- चंद्रिकापुरेगोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. प्रकल्पातील पाण्याने शेवटच्या टोकापर्यंत सिंचन व्हावे हा दृष्टीकोन आहे. वडेगाव वितरीकेपर्यंत सिंचनाची शेतकºयांची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. या तालुक्यात हा प्रकल्प आहे. निदान त्या तालुक्यातील शेतकºयांचे सिंचन झाले पाहिजे. आपण याबाबतीत शेतकºयांसोबत आहोत. शेतकºयांवरील हा अन्याय सहन करणार नाही. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया चंद्रीकापुरे यांनी व्यक्त केली.पाण्याचा अपव्ययइटियाडोह कालव्यातून वाहणारे पाणी अनेक ठिकाणी झिरपते. त्यामुळे कालव्याच्या आजूबाजूला पाणी दिसून येते. दरवर्षी कालवा कुठे ना कुठे तरी फुटतो. त्यामुळेही बºयाच पाण्याचा अपव्यय होतो. १४ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान कालव्यातून निरर्थक कारणाने पाणी वाहत होते. हे पाणी वेळीच थांबविले असते तर धरणातील पाण्याचा साठा अधिक राहीला असता ज्यामुळे रब्बी हंगामात अधीक शेतकºयांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देता आले असते. मात्र अधिकाºयांची मानसिकताच नसल्याचा आरोप ललीत खोब्रागडे या शेतकºयाने केला आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्प