शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

रब्बी धानपिकाला धरणाचे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:26 IST

इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांवर अन्याय आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणात पर्याप्त पाणीसाठा असतांनाही रब्बी धानपिकांच्या केवळ २१०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे षडयंत्र इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागाने रचले आहे. हा लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे वडेगाव वितरीकेपर्यंत ३९०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन द्यावे असे निवेदन येत्या २ ते ३ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.यासंदर्भात धाबेटेकडी-आदर्श येथील कृषी विद्यालयात शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.सदस्य किशोर तरोणे, राकॉचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सरपंच दिपक सोनवाने, विनायक मस्के, माणिक सोनवाने, बुराडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागावर यावेळी तिव्र असंतोष व्यक्त केला. काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या शेतीला सिंचन व्हावे यासाठी केवळ अर्जुनी-मोरगाव पर्यंत पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला.३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत धानपिकाला पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आम्ही कडधान्याचा विचार न करता धान पीक लागवडीसाठी मशागत केली. मात्र आता केवळ २१०० हेक्टरला अर्जुनी-मोरगाव पर्यंत सिंचन होईल असा फतवा काढल्यामुळे आमची फसगत केली असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. एकतर शेतीला पाणी द्यावे अन्यथा आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ही बाब मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.अन्याय सहन करणार नाही- चंद्रिकापुरेगोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. प्रकल्पातील पाण्याने शेवटच्या टोकापर्यंत सिंचन व्हावे हा दृष्टीकोन आहे. वडेगाव वितरीकेपर्यंत सिंचनाची शेतकºयांची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. या तालुक्यात हा प्रकल्प आहे. निदान त्या तालुक्यातील शेतकºयांचे सिंचन झाले पाहिजे. आपण याबाबतीत शेतकºयांसोबत आहोत. शेतकºयांवरील हा अन्याय सहन करणार नाही. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया चंद्रीकापुरे यांनी व्यक्त केली.पाण्याचा अपव्ययइटियाडोह कालव्यातून वाहणारे पाणी अनेक ठिकाणी झिरपते. त्यामुळे कालव्याच्या आजूबाजूला पाणी दिसून येते. दरवर्षी कालवा कुठे ना कुठे तरी फुटतो. त्यामुळेही बºयाच पाण्याचा अपव्यय होतो. १४ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान कालव्यातून निरर्थक कारणाने पाणी वाहत होते. हे पाणी वेळीच थांबविले असते तर धरणातील पाण्याचा साठा अधिक राहीला असता ज्यामुळे रब्बी हंगामात अधीक शेतकºयांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देता आले असते. मात्र अधिकाºयांची मानसिकताच नसल्याचा आरोप ललीत खोब्रागडे या शेतकºयाने केला आहे.

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्प