शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

शेतीला पुरेसे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:46 IST

पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : एका पाण्याची पिकांना तहान

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र कालव्यांत कचरा वाढल्याने पाणी टोकावरील गावापर्यंत पोहचत नसून हातचे पीक निसटते. करिता शेतीला पाणी सोडावे तसेच कालव्याची सफाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.यंदा पाऊस जिल्ह्यावर चांगलाच खूश दिसला. यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत चांगला पाणीसाठा आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात एका पाण्याची गरज पिकांना दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या होत्या. मात्र परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून उन्हाच्या तीव्र झळा धानपीकाला लागत आहेत. अशात शेत जमीनीला भेगा पडल्या आहेत.अनेक शेतकरी आजही वरथेंपी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे सिंचन विभागाकडे त्यांच्या नजरा लागल्या असून नवेगावबांध तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी करीत आहेत. पाच गाव मालकीचा हा नवेगावबांध तलाव आहे. या तलावावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. तलावातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र कालव्यांची स्थिती चांगली नसल्याने पाणी कित्येक गावांना मिळत नाही.कालव्यांत मोठ्या प्रमाणात कचरा उगवल्याने बाराभाटी, पिंपळगाव व खांबी या गावांना पाणी मिळत नाही. परिणामी हाती आलेले पीक शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी गमवावे लागते.कालव्यांच्या सफाईची गरजआता पाणी वापर संस्थेकडून पाण्याचे वितरण केले जात आहे. अशात मोजूनच पाणी मिळणार असेही दिसते. मात्र तलावातील पाणी सोडले तरिही ते टोकावरच्या गावांपर्यंत पोहचत नाही. कारण, कालवा कचºयाने बरबटला आहे. अशात पाण्याला अडथळा निर्माण होतो व पाणी अडून राहते. त्यामुळे पुरेसे पाणी मिळावे यासाठी कालव्याची सफाई करण्याची मागणीही बाराभाटी, येरंडी, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी, कुंभीटोला गावातील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती