शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

शेतीला पुरेसे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:46 IST

पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : एका पाण्याची पिकांना तहान

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र कालव्यांत कचरा वाढल्याने पाणी टोकावरील गावापर्यंत पोहचत नसून हातचे पीक निसटते. करिता शेतीला पाणी सोडावे तसेच कालव्याची सफाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.यंदा पाऊस जिल्ह्यावर चांगलाच खूश दिसला. यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत चांगला पाणीसाठा आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात एका पाण्याची गरज पिकांना दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या होत्या. मात्र परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून उन्हाच्या तीव्र झळा धानपीकाला लागत आहेत. अशात शेत जमीनीला भेगा पडल्या आहेत.अनेक शेतकरी आजही वरथेंपी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे सिंचन विभागाकडे त्यांच्या नजरा लागल्या असून नवेगावबांध तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी करीत आहेत. पाच गाव मालकीचा हा नवेगावबांध तलाव आहे. या तलावावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. तलावातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र कालव्यांची स्थिती चांगली नसल्याने पाणी कित्येक गावांना मिळत नाही.कालव्यांत मोठ्या प्रमाणात कचरा उगवल्याने बाराभाटी, पिंपळगाव व खांबी या गावांना पाणी मिळत नाही. परिणामी हाती आलेले पीक शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी गमवावे लागते.कालव्यांच्या सफाईची गरजआता पाणी वापर संस्थेकडून पाण्याचे वितरण केले जात आहे. अशात मोजूनच पाणी मिळणार असेही दिसते. मात्र तलावातील पाणी सोडले तरिही ते टोकावरच्या गावांपर्यंत पोहचत नाही. कारण, कालवा कचºयाने बरबटला आहे. अशात पाण्याला अडथळा निर्माण होतो व पाणी अडून राहते. त्यामुळे पुरेसे पाणी मिळावे यासाठी कालव्याची सफाई करण्याची मागणीही बाराभाटी, येरंडी, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी, कुंभीटोला गावातील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती