शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

शेतीला पुरेसे पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:46 IST

पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : एका पाण्याची पिकांना तहान

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र कालव्यांत कचरा वाढल्याने पाणी टोकावरील गावापर्यंत पोहचत नसून हातचे पीक निसटते. करिता शेतीला पाणी सोडावे तसेच कालव्याची सफाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.यंदा पाऊस जिल्ह्यावर चांगलाच खूश दिसला. यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत चांगला पाणीसाठा आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात एका पाण्याची गरज पिकांना दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या होत्या. मात्र परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून उन्हाच्या तीव्र झळा धानपीकाला लागत आहेत. अशात शेत जमीनीला भेगा पडल्या आहेत.अनेक शेतकरी आजही वरथेंपी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे सिंचन विभागाकडे त्यांच्या नजरा लागल्या असून नवेगावबांध तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी करीत आहेत. पाच गाव मालकीचा हा नवेगावबांध तलाव आहे. या तलावावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. तलावातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र कालव्यांची स्थिती चांगली नसल्याने पाणी कित्येक गावांना मिळत नाही.कालव्यांत मोठ्या प्रमाणात कचरा उगवल्याने बाराभाटी, पिंपळगाव व खांबी या गावांना पाणी मिळत नाही. परिणामी हाती आलेले पीक शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी गमवावे लागते.कालव्यांच्या सफाईची गरजआता पाणी वापर संस्थेकडून पाण्याचे वितरण केले जात आहे. अशात मोजूनच पाणी मिळणार असेही दिसते. मात्र तलावातील पाणी सोडले तरिही ते टोकावरच्या गावांपर्यंत पोहचत नाही. कारण, कालवा कचºयाने बरबटला आहे. अशात पाण्याला अडथळा निर्माण होतो व पाणी अडून राहते. त्यामुळे पुरेसे पाणी मिळावे यासाठी कालव्याची सफाई करण्याची मागणीही बाराभाटी, येरंडी, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी, कुंभीटोला गावातील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती