शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:16 IST

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

ठळक मुद्देतालुका काँग्रेसची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंबंधीचे निवेदन कमिटीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार संजय रामटेके यांना देण्यात आले.यंदा हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजावरुन (आकडेवारी) वरुन शेतकºयांनी आपल्या शेतामध्ये धानाचे पºहे लवकर टाकले. मात्र हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज खोटे ठरल्याने शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी काही ठिकाणी अजूनपर्यंत रोवणी झाली नाही. ज्यांनी धानाची रोवणी केली, त्या धानाला वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. यंदा पाऊस पडला नाही. तलाव, नाले, बोडी सुध्दा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे सर्व तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांसमोर जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, बेरोजगारी समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी हवालदिल आहे. यंदा जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टर शेतीमध्ये धान रोवणी केली. १० लाख शेतकरी व शेतमजूर शेतीवर अवलंबून आहेत.यंदा पाऊस कमी आल्यापासून शेतकºयांने आपल्या शेतामध्ये धानाची रोवणी कमी प्रमाण केली आहे. जे धान लावले त्यांना जिवंत ठेवणे कठीण झाले आहे. मागील महिन्यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण आतापर्यंत शेतकºयांचे कर्जमाफ झाले नाही. थकीत शेतकºयांना १० हजार रुपये अग्रीम म्हणून जाहीर केले. पण १० हजार रुपये अग्रीम राशी बँकांनी शेतकºयांना दिली नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी पिकविम्या पासून वंचीत राहिले. शासनाने पिकविम्या आॅनलाईन करण्यासाठी शेतकºयांना रांगेमध्ये उभे करुन शेतकºयांनी थट्टा केली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याला दुष्काळ घोषीत करुन शेतकºयांना त्वरीत मदत देण्याचे आदेश सरकारनी द्यावे, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांवर बँकेचे कर्ज असून त्या कर्जवसुली स्थगिती द्यावी, शेतकºयांकडून कर वसूली करु नये, पाणी पट्टी व शासकीय कराची वसूली थांबवावी, महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहता शेतकºयांना प्रती हेक्टर ३० हजार रुपये अनुदान द्यावे, शेतकºयांना वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत देयक माफ करुन वीज पुरवठा खंडीत करु नये, ज्या शेतकºयांचे विद्युत पुरवठा खंडीत झाले त्यांची जोडणी करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमत कमी करण्यात याव्या, आदि मागण्या या वेळी दिलेल्या निवेदनातून केल्या. शिष्टमंडळात तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.