शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:16 IST

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

ठळक मुद्देतालुका काँग्रेसची मागणी : तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंबंधीचे निवेदन कमिटीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार संजय रामटेके यांना देण्यात आले.यंदा हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजावरुन (आकडेवारी) वरुन शेतकºयांनी आपल्या शेतामध्ये धानाचे पºहे लवकर टाकले. मात्र हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज खोटे ठरल्याने शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी काही ठिकाणी अजूनपर्यंत रोवणी झाली नाही. ज्यांनी धानाची रोवणी केली, त्या धानाला वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. यंदा पाऊस पडला नाही. तलाव, नाले, बोडी सुध्दा कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे सर्व तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांसमोर जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, बेरोजगारी समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी हवालदिल आहे. यंदा जिल्ह्यामध्ये २ लाख हेक्टर शेतीमध्ये धान रोवणी केली. १० लाख शेतकरी व शेतमजूर शेतीवर अवलंबून आहेत.यंदा पाऊस कमी आल्यापासून शेतकºयांने आपल्या शेतामध्ये धानाची रोवणी कमी प्रमाण केली आहे. जे धान लावले त्यांना जिवंत ठेवणे कठीण झाले आहे. मागील महिन्यामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण आतापर्यंत शेतकºयांचे कर्जमाफ झाले नाही. थकीत शेतकºयांना १० हजार रुपये अग्रीम म्हणून जाहीर केले. पण १० हजार रुपये अग्रीम राशी बँकांनी शेतकºयांना दिली नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी पिकविम्या पासून वंचीत राहिले. शासनाने पिकविम्या आॅनलाईन करण्यासाठी शेतकºयांना रांगेमध्ये उभे करुन शेतकºयांनी थट्टा केली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याला दुष्काळ घोषीत करुन शेतकºयांना त्वरीत मदत देण्याचे आदेश सरकारनी द्यावे, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांवर बँकेचे कर्ज असून त्या कर्जवसुली स्थगिती द्यावी, शेतकºयांकडून कर वसूली करु नये, पाणी पट्टी व शासकीय कराची वसूली थांबवावी, महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहता शेतकºयांना प्रती हेक्टर ३० हजार रुपये अनुदान द्यावे, शेतकºयांना वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा, शेतकºयांचे कृषी पंपाचे विद्युत देयक माफ करुन वीज पुरवठा खंडीत करु नये, ज्या शेतकºयांचे विद्युत पुरवठा खंडीत झाले त्यांची जोडणी करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमत कमी करण्यात याव्या, आदि मागण्या या वेळी दिलेल्या निवेदनातून केल्या. शिष्टमंडळात तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांचा समावेश होता.