शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

रब्बीसाठी प्रकल्पाचे पाणी मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:58 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा असून हे पाणीे रब्बी पिकासाठी दिल्यास जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना बाघ प्रकल्पाने पाणी दिले होते.याचा गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला होता. दरवर्षी नहराच्या माध्यमातून सिरपूर जलाशयाचे पाणी दिले जाते.मात्र सध्यास्थितीत या प्रकल्पात केवळ २५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला, कालीसरार जलाशयात अनुक्रमे केवळ ७०.१० व ६९.४२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी सिरपूर जलाशयात सोडल्यानंतर सुध्दा रब्बी पिकांसाठी पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या सिरपूर जलाशयाचे पाणी गोंदिया शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा याच जलाशयाची गोंदियावासीयांना मदत झाली होती.नहराच्या दुरुस्तीवर १३० कोटीचा खर्चयावर्षी बाघ प्रकल्पाव्दारे नहरातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. सध्या नहराच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात केली जाणार आहे. हे पाणी रोटेशन पध्दतीने दिले जाणार असून यासंदर्भात नुकतीच पाणी वापर सहकारी संस्थाची नुकतीच एक बैठक पार पडली.- हेमराज छप्परघरे, कार्यकारी अभियंता बाघ व इटियाडोह विभाग, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई