शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

स्वातंत्र्यानंतरच्या मोठ्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 23:47 IST

आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली.

ठळक मुद्देजनआक्रोश रॅली। ५८ संघटनांचा सहभाग, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन, लोकशाही वाचवा, देश वाचवाचा नारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. जय ओबीसी, लोकशाही वाचवा देश वाचवा, संविधान वाचवा-देश वाचवा, अशा घोषणा देत शहराच्या विविध मार्गावरून जनआक्रोशन रॅली काढण्यात आली.शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातून दुपारी १ वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध ५२ संघटनांनी सहभाग घेतला.रॅलीचे नेतृत्त्व जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आदिवासी नेता डॉ.नामदेव किरसान,धनराज तुमडाम, जुबेर, मेहताबभाई, बलीराज धोटे, ओबीसी नेता श्रावण कटरे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, जीवन शरणागत, आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सतीश बंसोड, नंदूरकर, समता संग्राम परिषदेचे विनोद मेश्राम, राजू राहुलकर, मराठा सेवा संघाचे क्रांती ब्राह्मणकर, संभाजी ब्रिगेडच्या सविता बेदरकर, भाकपचे हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, ओबीसी संघटनेचे कैलास भेलावे, सचिन रहांगडाले,विकास लिल्हारे,प्रदीप राठोड,प्रमिला सिंद्रामे,गोपाल उईके, बसपाचे दिनेश गेडाम, प्रेम साठवने, आरती चवारे, निलेश देशभ्रतार, सुनील भोंगाडे, उत्तम यादव, राजीव ठकरेले यांनी केले. रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम येथे पोहचल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले.एससी,एसटी, ओबीसी व इतर समाजाला आता लढाईसाठी सज्ज व्हावे लागेल. गोंदियानंतर देशात ही लढाई लढण्यात येईल.सभेच्या प्रास्तविकातून संविधान मैत्री संघाच्या पौर्णिमा नागदेवे यांनी सांगितले की, समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी संविधान मैत्री संघाचा मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उत्तम यादव म्हणाले, ईव्हीएमच्या नावावर भ्रमीत करून सत्ता काबीज करण्यात आली. व्हीव्हीपॅटची १०० टक्के स्लीप मोजून दाखविल्यास निकाल काही वेगळाच असेल असे सांगितले.मेहताबभाई म्हणाले, सरकारला जागविण्यासाठी असे आंदोलन व्हायला हवे.संविधान वाचविण्याची जवाबदारी कोण्या एका व्यक्तीची नसून संपूर्ण ८० टक्के समाजाची आहे. पुरुषोत्तम मोदी म्हणाले, जे लोक जिवंत आहेत ते लोक आंदोलनात दिसत आहेत. वास्तविकतेत विविध जातींना आपल्या घरातच ठेवून मानवतेची लढाई लढावी लागेल.सविता बेदरकर म्हणाल्या उन्नाव प्रकराने खरा चेहरा समोर आला. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चालत आहोत असे सांगितले. जितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याप्रसंगी ओबीसी समाजाच्या नेत्यांना रात्रीच नजरकैदेत ठेवले. हा महाराष्टÑ सरकारचा खरा चेहरा आहे. संचालन शिव नागपुरे, सुनील पटले तर आभार अतुल सतदेवे यांनी मानले.

टॅग्स :Morchaमोर्चा