शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरच्या मोठ्या लढ्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 23:47 IST

आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली.

ठळक मुद्देजनआक्रोश रॅली। ५८ संघटनांचा सहभाग, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन, लोकशाही वाचवा, देश वाचवाचा नारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरक्षणाची मर्यादा ५० टक्यापर्यंत ठेवणे आणि त्यापेक्षा अधिकच्या आरक्षणाला हटविण्याच्या मागणीला घेऊन एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक नागरिकांनी‘आम्ही जिवंत आहोत’या नावावर शहरात शनिवारी (दि.१०) जनआक्रोश रॅली काढली. जय ओबीसी, लोकशाही वाचवा देश वाचवा, संविधान वाचवा-देश वाचवा, अशा घोषणा देत शहराच्या विविध मार्गावरून जनआक्रोशन रॅली काढण्यात आली.शहराच्या इंदिरा गांधी स्टेडियम परिसरातून दुपारी १ वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध ५२ संघटनांनी सहभाग घेतला.रॅलीचे नेतृत्त्व जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, आदिवासी नेता डॉ.नामदेव किरसान,धनराज तुमडाम, जुबेर, मेहताबभाई, बलीराज धोटे, ओबीसी नेता श्रावण कटरे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, जीवन शरणागत, आम आदमी पक्षाचे पुरुषोत्तम मोदी, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सतीश बंसोड, नंदूरकर, समता संग्राम परिषदेचे विनोद मेश्राम, राजू राहुलकर, मराठा सेवा संघाचे क्रांती ब्राह्मणकर, संभाजी ब्रिगेडच्या सविता बेदरकर, भाकपचे हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, ओबीसी संघटनेचे कैलास भेलावे, सचिन रहांगडाले,विकास लिल्हारे,प्रदीप राठोड,प्रमिला सिंद्रामे,गोपाल उईके, बसपाचे दिनेश गेडाम, प्रेम साठवने, आरती चवारे, निलेश देशभ्रतार, सुनील भोंगाडे, उत्तम यादव, राजीव ठकरेले यांनी केले. रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम येथे पोहचल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले.एससी,एसटी, ओबीसी व इतर समाजाला आता लढाईसाठी सज्ज व्हावे लागेल. गोंदियानंतर देशात ही लढाई लढण्यात येईल.सभेच्या प्रास्तविकातून संविधान मैत्री संघाच्या पौर्णिमा नागदेवे यांनी सांगितले की, समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी संविधान मैत्री संघाचा मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उत्तम यादव म्हणाले, ईव्हीएमच्या नावावर भ्रमीत करून सत्ता काबीज करण्यात आली. व्हीव्हीपॅटची १०० टक्के स्लीप मोजून दाखविल्यास निकाल काही वेगळाच असेल असे सांगितले.मेहताबभाई म्हणाले, सरकारला जागविण्यासाठी असे आंदोलन व्हायला हवे.संविधान वाचविण्याची जवाबदारी कोण्या एका व्यक्तीची नसून संपूर्ण ८० टक्के समाजाची आहे. पुरुषोत्तम मोदी म्हणाले, जे लोक जिवंत आहेत ते लोक आंदोलनात दिसत आहेत. वास्तविकतेत विविध जातींना आपल्या घरातच ठेवून मानवतेची लढाई लढावी लागेल.सविता बेदरकर म्हणाल्या उन्नाव प्रकराने खरा चेहरा समोर आला. आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे चालत आहोत असे सांगितले. जितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याप्रसंगी ओबीसी समाजाच्या नेत्यांना रात्रीच नजरकैदेत ठेवले. हा महाराष्टÑ सरकारचा खरा चेहरा आहे. संचालन शिव नागपुरे, सुनील पटले तर आभार अतुल सतदेवे यांनी मानले.

टॅग्स :Morchaमोर्चा