सडक-अर्जुनी : जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेची कामे करण्यासाठी कार्यरत असलेल्या ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांना जून, २०२० पासून आतापर्यंत मानधन मिळालेले नाही. वर्षभराचे मानधन देण्यात यावी, अशी मागणी करीत त्यांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन दिले आहे.
घरकूल लाभार्त्यांचे घरकूल मंजूर झाल्यावर ले-आउट देणे, जिओ टॅपिंग करणे, लाभार्थीचे आवश्यक कागदपत्र गोळा करणे, टप्पेनिहाय हप्ते वितरित करणे आदी कामे गृहनिर्माण अभियंता करीत आहेत. मात्र, तरीही जून, २०२० पासून आतापर्यंत त्यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे गृहनिर्माण अभियंत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात वर्षभराचे मानधन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आमदार चंद्रिकापुरे यांना दिले आहे, तसेच जोपर्यंत मानधन मिळणार नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा गृहनिर्माण अभियंता संघटनेचे अध्यक्ष हार्दिक ब्राह्मणकर यांनी दिले आहे.