शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

फुलचूर-नवेगावात गॅस्ट्रोचे थैमान

By admin | Updated: September 24, 2015 02:15 IST

गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे.

१०० वर रुग्णांवर उपचार : फुलचूरमध्ये लावले विशेष शिबिरगोंदिया/नवेगावबांध : गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. फुलचूर येथील १०० पेक्षा जास्त रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून नवेगावबांध येथील १२ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.गोंदिया शहरालगत फुलचूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये काही लोकांना मंगळवारी उलटी आणि हागवणीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गौरव देवेंद्र शहारे (१३), मोहन दौलत नागपुरे (६०), संगीता अमरकंठ नागपुरे (३२), बळीराम नागपुरे (३०), प्रमिला डोंगरे (३४) तथा आणखी एका रुग्णालाय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वास्तविक फुलचूरच्या वॉर्ड नं. ३ मध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर खमारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एक शिबिर लावण्यात आले. या शिबिरात १०४ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, २५ ते ३० वर्षे जुन्या पाईपलाईनमुळे नळाची पाईपलाईन लिकेज झाली. हे पाणी एका खड्ड्यात जमा झाले. त्यातील दूषित पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पोहोचले. खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कातोरे यांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे सांगितले. नवेगावबांध येथे पिण्याच्या पाण्याचा दुषीत पुरवठा झाल्यामुळे गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झाली. आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. पावसाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आरोग्य सेविका परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवितात. त्यानंतर ग्रामपंचायतच्या नोंदवहीत सूचना करतात. नवेगावबांध येथील आरोग्य सेविकेने दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टाकी स्वच्छ ठेवून ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी नोंदवहीत सूचना दिली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या सूचनेची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दिसू लागले. नवेगावबांध येथे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त मागील महिन्यात लोकमतने प्रकाशित केले होते. त्यावेळी ग्राम विकास अधिकारी टी.एम. समरित यांना पाण्याची नियमित तपासणी केली जाते असे सांगितले होते. मग आता गॅस्ट्रोची लागण कशी झाली असे प्रश्न निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे. आतातरी ग्रामपंचायतने पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)