शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

फुलचूर-नवेगावात गॅस्ट्रोचे थैमान

By admin | Updated: September 24, 2015 02:15 IST

गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे.

१०० वर रुग्णांवर उपचार : फुलचूरमध्ये लावले विशेष शिबिरगोंदिया/नवेगावबांध : गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. फुलचूर येथील १०० पेक्षा जास्त रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून नवेगावबांध येथील १२ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.गोंदिया शहरालगत फुलचूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये काही लोकांना मंगळवारी उलटी आणि हागवणीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गौरव देवेंद्र शहारे (१३), मोहन दौलत नागपुरे (६०), संगीता अमरकंठ नागपुरे (३२), बळीराम नागपुरे (३०), प्रमिला डोंगरे (३४) तथा आणखी एका रुग्णालाय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वास्तविक फुलचूरच्या वॉर्ड नं. ३ मध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर खमारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एक शिबिर लावण्यात आले. या शिबिरात १०४ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, २५ ते ३० वर्षे जुन्या पाईपलाईनमुळे नळाची पाईपलाईन लिकेज झाली. हे पाणी एका खड्ड्यात जमा झाले. त्यातील दूषित पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पोहोचले. खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कातोरे यांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे सांगितले. नवेगावबांध येथे पिण्याच्या पाण्याचा दुषीत पुरवठा झाल्यामुळे गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झाली. आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. पावसाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आरोग्य सेविका परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवितात. त्यानंतर ग्रामपंचायतच्या नोंदवहीत सूचना करतात. नवेगावबांध येथील आरोग्य सेविकेने दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टाकी स्वच्छ ठेवून ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी नोंदवहीत सूचना दिली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या सूचनेची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दिसू लागले. नवेगावबांध येथे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त मागील महिन्यात लोकमतने प्रकाशित केले होते. त्यावेळी ग्राम विकास अधिकारी टी.एम. समरित यांना पाण्याची नियमित तपासणी केली जाते असे सांगितले होते. मग आता गॅस्ट्रोची लागण कशी झाली असे प्रश्न निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे. आतातरी ग्रामपंचायतने पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)