शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

फुलचूर-नवेगावात गॅस्ट्रोचे थैमान

By admin | Updated: September 24, 2015 02:15 IST

गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे.

१०० वर रुग्णांवर उपचार : फुलचूरमध्ये लावले विशेष शिबिरगोंदिया/नवेगावबांध : गोंदियालगतच्या फुलचूर गावासह नवेगांवबांध येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. फुलचूर येथील १०० पेक्षा जास्त रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली असून नवेगावबांध येथील १२ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.गोंदिया शहरालगत फुलचूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये काही लोकांना मंगळवारी उलटी आणि हागवणीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गौरव देवेंद्र शहारे (१३), मोहन दौलत नागपुरे (६०), संगीता अमरकंठ नागपुरे (३२), बळीराम नागपुरे (३०), प्रमिला डोंगरे (३४) तथा आणखी एका रुग्णालाय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. वास्तविक फुलचूरच्या वॉर्ड नं. ३ मध्ये गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर खमारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एक शिबिर लावण्यात आले. या शिबिरात १०४ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, २५ ते ३० वर्षे जुन्या पाईपलाईनमुळे नळाची पाईपलाईन लिकेज झाली. हे पाणी एका खड्ड्यात जमा झाले. त्यातील दूषित पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पोहोचले. खमारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कातोरे यांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे सांगितले. नवेगावबांध येथे पिण्याच्या पाण्याचा दुषीत पुरवठा झाल्यामुळे गावामध्ये गॅस्ट्रोची लागण झाली. आतापर्यंत ग्रामीण रुग्णालयात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. पावसाळ्याच्या कालावधीत पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आरोग्य सेविका परिसरातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवितात. त्यानंतर ग्रामपंचायतच्या नोंदवहीत सूचना करतात. नवेगावबांध येथील आरोग्य सेविकेने दि. १९ सप्टेंबर २०१५ रोजी गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टाकी स्वच्छ ठेवून ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी नोंदवहीत सूचना दिली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या सूचनेची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दिसू लागले. नवेगावबांध येथे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त मागील महिन्यात लोकमतने प्रकाशित केले होते. त्यावेळी ग्राम विकास अधिकारी टी.एम. समरित यांना पाण्याची नियमित तपासणी केली जाते असे सांगितले होते. मग आता गॅस्ट्रोची लागण कशी झाली असे प्रश्न निर्माण झाले आहे. रुग्णांची संख्या अजुन वाढण्याची शक्यता आहे. आतातरी ग्रामपंचायतने पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा व हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर)