शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

तंत्रनिकेतनच्या पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत सरस गुण ...

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : कोरोनाच्या संसर्गामुळे तंत्रनिकेतन शिक्षण बंद पडले. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत सरस गुण देण्यात आले. त्यामुळे उन्हाळी २०२० पर्यंत उत्तीर्ण झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांना त्या तुलनेत टक्केवारी कमी असल्याने हजारो जुने विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित झाले आहेत. प्रवेश न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. शासनाने अशा विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद पडल्या. या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. तंत्रनिकेतनच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत गुणांची सरबराई झाली. जवळपास प्रत्येक विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविका अंतिम वर्षात उत्तीर्ण झाला. प्रत्येक विद्यार्थ्याला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. याचा जुन्या विद्यार्थ्यांवर थेट परिणाम झाला. हा एक प्रकारचा जुन्या विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. यासाठी मर्यादित जागा असतात. या जागांवर कोरोना काळात ऑनलाइन परीक्षेत गुणांची खैरात झाल्याने अंतिम वर्षाला राहून तंत्रनिकेतन पदविका घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्णी लागली.प्रावीण्यप्राप्त व प्रथम श्रेणीत पदविका मिळविणारे जुने विद्यार्थी मात्र प्रवेशापासून वंचित राहिले. एरव्ही दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त असायच्या.कोरोनामुळे प्रभावित झालेल्या शैक्षणिक सत्रामुळे स्पर्धा वाढली व अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झाले.आजघडीला पूर्व विदर्भातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ( बीई )थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी एकही जागा शिल्लक नाही.आता प्रवेश न मिळालेल्या अशा विद्यार्थ्यांनी वर्षभर काय करायचे असा मोठा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.

......

दलालांचा सुळसुळाट

शहरी भागात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे.त्या तुलनेत तंत्रनिकेतन संस्था कमी आहेत.संस्थांची गुत्तेदारी कायम टिकवून ठेवण्यासाठी संस्थाचालकांनी ग्रामीण भागात दलाल नेमले आहेत.हे दलाल तंत्रनिकेतन उत्तीर्ण व अंतिम वर्षाला असलेल्या पालकांच्या घरी भेटी देऊन अभियांत्रिकी प्रवेश मिळवून देतो,त्याउपरही त्याला पैसे देऊ,अभियांत्रिकी अभ्यासक्रमादरम्यान त्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही अशी बतावणी करतात.पालकांना मोफत अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रलोभन दाखवितात. या मोबदल्यात संस्थाचालक दलालांकडून विद्यार्थ्याचे मूळ प्रमाणपत्र मिळताच त्यांना प्रति विद्यार्थी १५ ते २० हजार रुपयांची बक्षिसी देतात.मात्र यावर्षी दलालांचा डाव फसला.

...........

रॅकेट सक्रिय

संस्थाचालकांनी दिलेली बक्षिसी यावर्षी पहिल्यांदाच दलालांनी त्यांना परत केली. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालक डल्ला मारतात.यातून ते दरवर्षी लाखोंची माया मिळवितात.विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचा पैशासाठी छळ होतो.अनेक विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र अडवून ठेवले जात असल्याचेही वृत्त आहे. नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली,सेंदूरवाफा,तुमसर,तिरोडा, पवनी व ग्रामीण परिसरात अशा दलालांचे रॅकेटच असल्याचे समजते.