शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कल्याण केंद्रामार्फत ४ लाख ८४ हजारांचा निधी वाटप

By admin | Updated: April 25, 2017 00:52 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार कल्याण निधी भरणा करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

विविध उपक्रम : कामगार व त्यांच्या कुुटुंबीयांसाठी अर्थसहाय्यगोंदिया : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार कल्याण निधी भरणा करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत यावर्षी केंद्राच्या वतीने चार लाख ८४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले.कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके, एमएससीआयटी सहायता योजना, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव, सत्कार योजनेंतर्गत कामगारांच्या मुलांना निधी वाटप तसेच विविध गंभीर आजारांसाठी कामगारांना आर्थिक मदत केली जाते. यावर्षीसुद्धा कामगार कल्याण केंद्र गोंदियाच्या वतीने चार लाख ८४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले.कामगारांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण निधीचा वार्षिक भरणा केला जातो. यामध्ये कामगार ज्या ठिकाणी कार्यरत आहे, त्या कंपनीच्या संचालकाकडून कामगार कल्याण निधी जमा केली जाते. या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार कल्याण केंद्रामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. त्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पाठ्यपुस्तकांसाठी पैसा वाटप केला जातो. याशिवाय असाध्य रोग व गंभीर आजार झाल्यास कामगारांना व कुटुंबीयांना अर्थसहाय्य दिले जाते.यावर्षी कामगार कल्याण मंडळांतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ९५ विद्यार्थ्यांना दोन लाख ७१ हजार ५०० रूपयांचे वाटप करण्यात आले. पाठ्यपुस्तक सहायता योजनेंतर्गत १७ विद्यार्थ्यांना ११ हजार ८६१ रूपयांचे वाटप करण्यात आले. एमएससीआयटी योजनेंतर्गत आठ विद्यार्थ्यांना १३ हजार ६५० रूपयांचे वाटप करण्यात आले. असाध्य रोग व गंभीर आजार योजनेंतर्गत १३ कामगारांना एक लाख ८० हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एका विद्यार्थ्याला दोन हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी गुणगौरव सत्कार योजनेंतर्गत श्रद्धा सुभाष रामटेके या वर्ग बारावीच्या विद्यार्थिनीने ९१.५४ टक्के गुण मिळविल्याने तिला पाच हजार रूपये देवून सत्कार करण्यात आला. कामगार कल्याण केंद्रामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्राचे संचालक ताम्रदीप जांभूळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)