शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बेरोजगारांचा जिल्हाधिकारीे कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:30 IST

जिल्ह्यात रोजगाराची समस्या तीव्र असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना देखील नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रोजगाराची समस्या तीव्र असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना देखील नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेरोजगार युवकांनी गुरूवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, उद्योगमंत्री, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना देण्यात आले. गुरूवारी दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौक येथून मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यात शेकडो युवक सहभागी झाले होते. गोंदिया जिल्हा रोजगाराच्या दृष्टिकोनातून मागासलेला आहे. जिल्ह्यात सुशिक्षितांची फौज तयार होत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे.बिरसी विमानतळ व अदानी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देण्यात यावी, रेल्वे स्थानकातील ४०० व्हेंडरचे व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात यावे, नगरपरिषद गोंदिया व रोहयोअंतर्गत दुकान गाळे तयार करून सुशिक्षित बेरोजगारांना वाटप करण्यात यावे, जिल्हा सामान्य रुग्णालयाची रखडलेली पदभरती प्रकिया पूर्ण करण्यात यावी.या मागण्यांचा समावेश असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महिरे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष प्रतिक मेश्राम, कमलेश वैद्य, निलेश बावणकर, निशिकांत बन्सोड, शाहरुख पठाण, कैलाश बन्सोड, सुधीर ढोमणे यांचा समावेश होता.