शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मोफत धान्य वाटपात होत आहे घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्यक्रमा अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच अतिशय गरजू व्यक्तीला देण्यास प्राधान्य आहे.

ठळक मुद्देबायोमॅट्रिक नसल्याचा गैर फायदा । अधिकाऱ्यांचे प्रकाराकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ‘लॉकडाऊन’मुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने नियमित रेशन देण्याव्यतिरिक्त लाभार्थ्यांला दर महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मागील २ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटपाला सुरूवात झाली असून अनेक स्वस्त धान्य दुकानदार तांदूळ वाटपात गैरप्रकार करीत असल्याची ओरड तालुक्यात अनेक गावात सुरू आहे.‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्यक्रमा अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच अतिशय गरजू व्यक्तीला देण्यास प्राधान्य आहे. मोफत तांदूळ वाटप करताना बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर करण्याची गरज नाही. शिधापत्रिकेवर जेवढ्या व्यक्तीची नोंद आहे तेवढ्यांना प्रत्येकी ५ किलो प्रमाणे तांदूळ द्यायचे आहे. परंतु तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार घोळ करीत असल्याचा प्रकार सामोर आला आहे.तालुक्यातील एकूण ८७ स्वस्त धान्य दुकानांमधील अनेक दुकानदारांनी शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून मनमानी करीत असल्याची माहिती आहे. एका गावात एक शिधापत्रिकाधारक मोफत स्वस्त धान्य मागायला गेले असता कार्डवर ५ लोकांची नोंद असून त्याला २५ किलो तांदूळ देण्याऐवजी फक्त १५ किलो तांदूळ दिले.एका दुसऱ्या दुकानदाराने २० किलो ऐवजी १५ किलो दिल्याची तक्रार आहे. एका दुकानदाराने धान्यच आले नाही म्हणून कार्डधारकाला परत घरी पाठविले. तर एका दुकानदाराने या महिन्यात मिळणार नाही असे सांगितल्याची तक्रार समोर आली आहे.१ एप्रिलपासून मोफत तांदूळ देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश असून सुद्धा काही स्वस्त धान्य दुकानदार ग्रामीण भागातील जनतेला मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसार माध्यमातून आता शासनाचे प्रत्येक निर्णय लोकांना त्वरीत व स्पष्टपणे माहिती होतात. तरी काही लोक आपली चालाखी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासना आदेशाप्रमाणे लोकांना धान्य वाटप केले जात आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांनी आपली यंत्रणा कामाला लावली पाहिजे.तसेच संशयीत ठिकाणी स्वत: जावून पाहणी केली पाहिजे. परंतु तहसीलदार या बाबतीत स्वयंस्फूर्त दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.धान्य वाटपात विलंब का?प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून करणे गरजेचे होते. काही तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता १-२ दिवस उशीर समजता येईल. परंतु मोफत धान्य वाटपात पूर्ण एक आठवडा उशीरा झाला असून काही दुकानदारांनी आतापर्यंत वाटप सुरू केले नाही. दरम्यान ‘लोकमत’ प्रतिनिधीने याबाबत सुरूवातीला ३ एप्रिल रोजी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शासनाचे आदेश मिळाले नाही व मोफत देण्याचे तांदूळ सुद्धा आले नाही असे सांगितले. त्यानंतर लगेच तहसीलदारांशी विचारपूस केल्यावर पदाला साजेसे उत्तर न देता गोदाम खाली नसल्याने धान्य आणले नाही असे सांगीतले. यावरून अधिकारी किती जवाबदारीने शासन आदेशाचे पालन करीत आहेत हे दिसून आले.लाभार्थी कार्डधारकांना शासनाच्या आदेशान्वये मोफत तांदूळ न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारविरूद्ध कार्यवाही करण्यात येईल. यात आपली जवाबदारी इमानदारीने पार पाडत नसल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही गय केली जाणार नाही.-सहषराम कोरोटेआमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र.

टॅग्स :government schemeसरकारी योजना