शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 00:44 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार

१३५ शाळांत २५ टक्के प्रवेश : अर्ज करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यांतर्गत यंदा जिल्ह्यातील १३५ शाळांत ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचे बोलले जात असून शिक्षणावरील आजचा खर्च बघितल्यास ही बाब खरोखरच वाटते. या महागड्या शिक्षणामुळे अंगी गुण असलेला होनहार विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. यांतर्गत गरजू व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांत २५ टक्के प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी गरजू घटकाला याचा चांगलाच फायदा मिळत असून अशांची मुले शिक्षण घेत आहेत. तर येणाऱ्या शिक्षण सत्रासाठी शाळा नोंदणी १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी होणार आहे. पालकांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज ५ ते २१ तारखेपर्यंत भरावयाचे आहेत. यात पहिली लॉटरी २७ आणि २८ तारखेला काढली जाईल. तर १ ते ९ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यावयाचे आहेत. प्रवेश घेण्याच्या विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १० ते ११ मार्चपर्यंत दर्शवावयाच्या आहेत. दुसरी लॉटरी १४ व १५ मार्च रोजी असून १६ ते २१ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. २२ व २३ मार्चपर्यंत विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या असून तीसरी लॉटरी २४ व २५ मार्च रोजी राहील. विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे २७ मार्च ते १ एप्रिल व विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा ३ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत दर्शवायच्या आहेत. चवथी लॉटरी ७ व ८ एप्रिल रोजी असून १० ते १५ एप्रिल दरम्यान विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १७ व १८ एप्रिल रोजी दर्शवायच्या असून पाचवी लॉटरी १८ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी राहील. २१ ते २७ एप्रिल दरम्यान पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. तर २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या आहेत. सदर प्रवेश प्रकियेदरम्यान संबधित तालुक्याचे गटसाधन केंद्रस्थळी मदत केंद्र निर्माण केले आहे. सदर काळात सर्व शाळांनी शाळा नोंदणी व पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)