शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

चार हजार पर्यटक वाढले

By admin | Updated: January 12, 2016 01:31 IST

जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आकर्षण वनपर्यटकांमध्ये हळूहळू वाढायला लागले आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्र : गतवर्षीच्या तुलनेत ७.९२ लाखांचे अधिक उत्पन्नदेवानंद शहारे गोंदियाजिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आकर्षण वनपर्यटकांमध्ये हळूहळू वाढायला लागले आहे. या प्रकल्पाला भेटी देणाऱ्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास चार हजार पर्यटकांची भर पडली आहे. वन्यजीव विभागाने नोंदविलेल्या संख्येमुळे ही बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत सात लाख ९२ हजार ३७६ रूपयांचे अधिक उत्पन्न पर्यटकांच्या माध्यमातून वन्यजीव विभागाला झाले आहे.एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान २४ हजार ९९३ पर्यटकांनी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. यावर्षी सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबरदरम्यान व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून २८ हजार ८२० झाली. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी काही विशेष सुविधा वन व वन्यजीव विभागाकडून वाढविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसून येत आहे. खुल्या जिप्सीतून वाघाचे दर्शन करणे या हेतून पर्यटक येतात, पण बहुतांश पर्यटकांना वाघ किंवा बिबट्याचे दर्शन मात्र होत नाही. इतर प्राण्यांचे मात्र हमखास दर्शन होते.कॅमेरा शुल्कातून १.६९ लाखवन्यजीवांच्या दर्शनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून पर्यटक गोंदिया जिल्ह्यात येतात. या पर्यटकांना वन्य प्राण्यांचे छायाचित्र काढण्याचे आकर्षण असते. त्यासाठी अनेक जण स्वत:चे कॅमेरे आणतात. एवढेच नाही तर भाड्यानेही कॅमेरे उपलब्ध करून दिले जातात. सन २०१४ मध्ये नऊ महिन्यांत एक हजार ५८१ पर्यटकांनी वन विभागाच्या कॅमेऱ्यांचा उपयोग केला. त्याद्वारे एक लाख ४० हजार २१४ रूपये वन्यजीव विभागाच्या खात्यात जमा झाले. सन २०१५ मध्ये एक हजार ७७९ पर्यटकांनी कॅमेऱ्यांचा उपयोग केला. त्याद्वारे वन्यजीव विभागाला एक लाख ६९ हजार ०७५ रूपयांचे शुल्क प्राप्त झाले. प्रचार-प्रसारासाठी व्यवस्थेचा अभावनागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प १२ डिसेंबर २०१३ ला अस्तित्वात आला. राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प म्हणून याची घोषणा झाल्यानंतर याच्या प्रचार व प्रसारासाठी कोणतेही ठोस पाऊल वन्यजीव विभागाने उचलले नाही. त्यामुळे आजही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची ओळख लोकांना नाही. केवळ ‘माऊथ पब्लिसिटी’मधून जो झाला त्याच प्रचारावर पर्यटक येथे आशेने येतात. वन्यजीव विभागाला प्रचार-प्रसारासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक जेवढ्या संख्येत येणे अपेक्षित असते, तेवढ्या संख्येत येत नाही. पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीसुद्धा वन्यजीव विभाग फारसा गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वाहनांची संख्या वाढलीबाहेरून आलेल्या पर्यटकांना वन्यजीव विभागाच्या वतीने जंगल सफारीसाठी वाहनांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. एप्रिल ते डिसेंबर २०१४ या ९ महिन्यात वाहनांच्या चार हजार १५५ फेऱ्यांमधून ४ लाख २४ हजार ५४५ रूपयांचे शुल्क उपलब्ध झाले आहे. तर सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबरदरम्यान जंगलात वाहनांच्या ५ हजार ४०५ फेऱ्या झाल्या. त्याद्वारे सात लाख ६५ हजार २१५ रूपयांचे शुल्क वन्यजीव विभागाने पर्यटकांकडून वसूल केले.