शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जिल्ह्यातील चार योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:04 IST

ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे.

ठळक मुद्देपाणी पेटणार : उन्हाळ््यापूर्वी तोडगा काढण्याची गरज

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनांतून गाव आपली तहान भागवित असून या योजना गावकऱ्यांसाठी वरदान ठरतात. असे असताना मात्र जिल्ह्यातील चार योजना बंद असल्याची माहिती आहे. लवकरच या योजना सुरू न झाल्यास येणाºया काळात या गावांत पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत असून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी पेट घेऊन ग्रामीणांची पाण्यासाठी भटकंती होते. पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी शासनाकडून प्रत्येकच गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनेतून त्या गावाला पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबत आहे.जिल्ह्यात आजघडीला ३२१ पाणी पुरवठा योजना असून यांच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा होतो. शिवाय गरजेनुसार अन्य काही योजनांचे काम सुरू आहे. या पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी मिळत असल्यामुळे गावकºयांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत नाही.योजनांत काही बिघाड आल्यास किंवा काही अन्य कारणांमुळे योजना बंद पडल्यास गावात हडकंप माजतो. पाणी न मिळाल्यास गावकºयांना पाण्यासाठी अन्य साधनांवर अवलंबून रहावे लागते. मात्र उन्हाळ््यात अन्य साधनांनीही साथ सोडल्यास पाणी पेट घेऊन त्या गावांत हाहाकार माजतो.आता दोन महिन्यांवर उन्हाळा आला असून यंदा उन्हाळ््यात पाणी टंचाईची पूर्ण चिन्हे दिसून येत आहेत. असे असताना मात्र, जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील ग्राम देवरी, सालेकसा तालुक्यातील ग्राम कावराबांध, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम गौरनगर व कोरंभीटोला येथील पाणी पुरवठा योजना बंद पडून आहे. यंदा आतापासूनच नदी, नाले व तलावांत ठणठणाट असताना भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. अशात उन्हाळ््यात या चार गावांत पाणी पेटणार यात मात्र शंका वाटत नाही.देखभाल-दुरूस्तीचा अभावजिल्ह्यातील ९ योजनांना वीज जोडणी न मिळाल्यामुळे त्या बंद पडून आहेत. मात्र देवरी, कावराबांध, गौरनगर व कोरंभीटोला येथील या योजनांना देखभाल-दुरूस्तीतील अभावाचा फटका बसला असल्याची माहिती आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजना तयार झाल्यानंतर ग्रामपंचायतला हस्तांतरीत केली जाते. त्यानंतर संबंधीत ग्रामपंचायतला योजनेची देखभाल-दुरूस्ती करावी लागते. यासाठी पाणीपट्टी गोळा करून योजनेसाठी येणारे खर्च करावे लागतात. मात्र बहुतांश वेळी विजेचे बील न भरण्याचे प्रकार पुढे येतात. शिवाय अन्य काही कारणांमुळेही योजना बंद पडतात. या चार योजनांनाही यातीलच काही प्रकारांचा फटका बसला आहे.