शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:04 IST

ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे.

ठळक मुद्देपाणी पेटणार : उन्हाळ््यापूर्वी तोडगा काढण्याची गरज

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रत्येक गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनांतून गाव आपली तहान भागवित असून या योजना गावकऱ्यांसाठी वरदान ठरतात. असे असताना मात्र जिल्ह्यातील चार योजना बंद असल्याची माहिती आहे. लवकरच या योजना सुरू न झाल्यास येणाºया काळात या गावांत पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत असून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी पेट घेऊन ग्रामीणांची पाण्यासाठी भटकंती होते. पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी शासनाकडून प्रत्येकच गावाला त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिली जात आहे. या योजनेतून त्या गावाला पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबत आहे.जिल्ह्यात आजघडीला ३२१ पाणी पुरवठा योजना असून यांच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा होतो. शिवाय गरजेनुसार अन्य काही योजनांचे काम सुरू आहे. या पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी मिळत असल्यामुळे गावकºयांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येत नाही.योजनांत काही बिघाड आल्यास किंवा काही अन्य कारणांमुळे योजना बंद पडल्यास गावात हडकंप माजतो. पाणी न मिळाल्यास गावकºयांना पाण्यासाठी अन्य साधनांवर अवलंबून रहावे लागते. मात्र उन्हाळ््यात अन्य साधनांनीही साथ सोडल्यास पाणी पेट घेऊन त्या गावांत हाहाकार माजतो.आता दोन महिन्यांवर उन्हाळा आला असून यंदा उन्हाळ््यात पाणी टंचाईची पूर्ण चिन्हे दिसून येत आहेत. असे असताना मात्र, जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील ग्राम देवरी, सालेकसा तालुक्यातील ग्राम कावराबांध, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम गौरनगर व कोरंभीटोला येथील पाणी पुरवठा योजना बंद पडून आहे. यंदा आतापासूनच नदी, नाले व तलावांत ठणठणाट असताना भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे. अशात उन्हाळ््यात या चार गावांत पाणी पेटणार यात मात्र शंका वाटत नाही.देखभाल-दुरूस्तीचा अभावजिल्ह्यातील ९ योजनांना वीज जोडणी न मिळाल्यामुळे त्या बंद पडून आहेत. मात्र देवरी, कावराबांध, गौरनगर व कोरंभीटोला येथील या योजनांना देखभाल-दुरूस्तीतील अभावाचा फटका बसला असल्याची माहिती आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजना तयार झाल्यानंतर ग्रामपंचायतला हस्तांतरीत केली जाते. त्यानंतर संबंधीत ग्रामपंचायतला योजनेची देखभाल-दुरूस्ती करावी लागते. यासाठी पाणीपट्टी गोळा करून योजनेसाठी येणारे खर्च करावे लागतात. मात्र बहुतांश वेळी विजेचे बील न भरण्याचे प्रकार पुढे येतात. शिवाय अन्य काही कारणांमुळेही योजना बंद पडतात. या चार योजनांनाही यातीलच काही प्रकारांचा फटका बसला आहे.