शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

हंडाभर पाण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात चार कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:54 IST

अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे.

ठळक मुद्देशेतातील विहिरींचा आधारपाणी पुरवठा योजनेचा अभाव

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अख्खं आयुष्य सरले, पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय, सरकारला आम्हा अतिदुर्गम भागातील नागरिकांची केव्हा कीव येणार, अन् आमच्या डोईवरचा हंडा केव्हा खाली येणार? हे शब्द आहेत गोरेगाव तालुक्याच्या पूर्व दिशेला वसलेल्या गौरीटोला या अतिदुर्गम गावातील महिलांचे. मागील पाच महिन्यापासून या गावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. शेतातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी आणून येथील गावकरी आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे.गोरेगाव तालुक्यातील गौरीटोला हे गाव. या गावाला जाण्यासाठी दोन वर्षापूर्वी साधे रस्तेही नव्हते. रस्ते झाले असले तरी येथील पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आणि परिसरातील तलाव आणि सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्याने जानेवारी महिन्यापासून गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सातशे लोकसंख्या असलेल्या या गावात खासगी १२ विहिरी व ५ बोअरवेल आहेत. मात्र विहिरींना जानेवारी महिन्यापासूनच पाणी नाही तर बोअरवेलनी सुध्दा तळ गाठला आहे. आता शेतातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी आणून कसाबसा उन्हाळा काढायचे असे धोरण गावकऱ्यांनी अवलंबविले आहे. येथील पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना तीन ते चार किमी पायपीट करावी लागत आहे. मागील पाच महिन्यांपासून येथील गावकºयांची पाण्यासाठी पायपीट कायम आहे. तर तापमानात सुध्दा सातत्याने वाढ होत असल्याने हळूहळू शेतातील विहिरींनी सुध्दा तळ गाठण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पाऊस न झाल्यास ही समस्या पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईचा विचार करुनच गावकºयांची झोप उडत असल्याचे चित्र आहे. तिल्ली ग्रामपंचायत अधिनस्थ गौरीटोला हे गाव येते.मात्र येथील लोकांना भौतिक सुविधांचाही दुष्काळ आहे. दुष्काळाच्या झळांनी कोरड्या पडणाऱ्या घशाची तहान भागविण्यासाठी प्रशासन कधी जागेल असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.सहा बोअरवेल व एक विहीरगौरीटोला येथे शासनाने ६ बोअरवेल व एक विहीर तयार केली आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या या विहिरीला थोडेफार पाणी आहे. पण बोअरवेलची बिकट स्थिती आहे. या बोअरवेलमधून पिण्यायोग्य पाणी येत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे.

गावात पाणी पुरवठ्याची साधने अपुरी असल्याने दरवर्षी गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र मागील पंधरा वीस वर्षांत यंदा प्रथमच पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली. मागील पाच महिन्यापासून आम्ही शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवित आहोत.-भिमराज चौरागडे, गावकरी, गौरीेटोला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई