शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

शेतकर्‍यांच्या धानावर चालला वन विभागाचा बुलडोजर

By admin | Updated: May 25, 2014 23:39 IST

गरिबीतून सावरण्यासाठी सावंगी येथील शेतकर्‍यांनी रबी धानाचे उत्पन्न काढले. परंतु वन विभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतकर्‍याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा प्रकार सावंगी येथे घडला.

दोन एकरातील पीक नष्ट : १८ एकरातील अतिक्रमणधारकांना अभय

आमगाव : गरिबीतून सावरण्यासाठी सावंगी येथील शेतकर्‍यांनी रबी धानाचे उत्पन्न काढले. परंतु वन विभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतकर्‍याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा प्रकार सावंगी येथे घडला.

सावंगी येथील तिलकचंद भागचंद लिल्हारे यांनी महसूल विभागाच्या जागेवर १९७0 ला दोन एकरात अतिक्रमण केले. त्यात १९९२-९३ ला दंड म्हणून २00 रुपये व २00७ ला १ हजार रुपये दंड तहसील कार्यालयात भरले.

गावात जवळपास १८ एकरावर लोकांनी अतिक्रमण केले. त्यात शेत जमिन व स्वत:ची पक्के घरे तयार करण्यात आली. इतर शेतकर्‍यांना सोडून तिलकचंद लिल्हारे यांच्या शेतात उभ्या असलेल्या धानावर वनविभागाने बुलडोजर चालविला आहे. आता धान हातात येणार या आशेत असलेल्या शेतकर्‍याच्या पिकावर वनविभागाने जेसीपी व ट्रॅक्टर लावून दोन एकर शेतातील उभे पिक नष्ट केले. ही कारवाई करताना वन विभागाच्या जवळ अतिक्रमण हटविण्याचे कोणतेच आदेश नाही. गोंदिया न्यायालयाने तिलकचंद लिल्हारेचा अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणाची १९ जून १४ गोंदिया येथे पेशी आहे. मात्र निर्दयी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी कोणतीही राजरोषपणे पोलिसाचा कर्मचार्‍याचा ताफा घेऊन हाती येणारे धानपिक नष्ट केले. यात सदर शेतकर्‍याचा ६0 ते ७0 हजाराचे नुकसान झाले.

दोन वर्षापूर्वी सावंगी येथे ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात तिलकचंद लिल्हारे, खेलचंद, गेलचंद, फुलचंद या सर्वांंनी गावात ज्याचा दबदबा आहे. त्याला मतदान केले नाही व त्या व्यक्तीचा निवडणूकीत पराभव झाला. ५00 ते ६00 लोकसंख्या असलेल्या गावात संपूर्ण गाव एका बाजूला व लिल्हारे कुटूंब एका बाजूला होते. त्यात वनहक्क समितीचे सचिव व वन सरंक्षण अध्यक्ष याच्या दबावतंत्राने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर या लिल्हारे कुटूंबियाचे लहान मुले शेजारच्या गावी शिक्षण घेण्याकरिता जात आहेत. त्यांना विरोधकांमुळे आमच्याशी बोलायचे नाही, असे सांगून त्यांची हेटाळणी करतात. वनविभागाची कारवाई थांबविण्याकरीता १0 ते २0 हजाराची मागणी केल्याचे तक्रारकर्त्यानी सांगीतले. या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी माणुसकी दाखविली नाही. पीडित कुटुंबातील लहान मुलाना सालेकसा पोलिसानी बाजीरावचा दणका दिला. पोलिसाकडून त्यांना धमक्या दिल्या गेल्या. विशेष म्हणजे १८ एकर जागेवर अतिक्रमण असताना उर्वरीत लोकावर कारवाई करण्यात आली नाही. धान पिकावर वनविभागाची ही दंडूकशाही पोलिसानी मुक आणि बधीर होऊन पाहीली. या प्रकरणात वनविभागाचे अधिकारी ठवकर यांच्याकडे सुपूर्द केला. (तालुका प्रतिनिधी)