शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
2
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
3
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
4
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
5
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
6
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
7
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
8
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
9
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
10
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
11
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
12
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
13
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
14
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
15
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
16
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
17
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
18
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
19
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
20
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

शेतकर्‍यांच्या धानावर चालला वन विभागाचा बुलडोजर

By admin | Updated: May 25, 2014 23:39 IST

गरिबीतून सावरण्यासाठी सावंगी येथील शेतकर्‍यांनी रबी धानाचे उत्पन्न काढले. परंतु वन विभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतकर्‍याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा प्रकार सावंगी येथे घडला.

दोन एकरातील पीक नष्ट : १८ एकरातील अतिक्रमणधारकांना अभय

आमगाव : गरिबीतून सावरण्यासाठी सावंगी येथील शेतकर्‍यांनी रबी धानाचे उत्पन्न काढले. परंतु वन विभागाच्या हुकुमशाही धोरणाने त्या शेतकर्‍याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा प्रकार सावंगी येथे घडला.

सावंगी येथील तिलकचंद भागचंद लिल्हारे यांनी महसूल विभागाच्या जागेवर १९७0 ला दोन एकरात अतिक्रमण केले. त्यात १९९२-९३ ला दंड म्हणून २00 रुपये व २00७ ला १ हजार रुपये दंड तहसील कार्यालयात भरले.

गावात जवळपास १८ एकरावर लोकांनी अतिक्रमण केले. त्यात शेत जमिन व स्वत:ची पक्के घरे तयार करण्यात आली. इतर शेतकर्‍यांना सोडून तिलकचंद लिल्हारे यांच्या शेतात उभ्या असलेल्या धानावर वनविभागाने बुलडोजर चालविला आहे. आता धान हातात येणार या आशेत असलेल्या शेतकर्‍याच्या पिकावर वनविभागाने जेसीपी व ट्रॅक्टर लावून दोन एकर शेतातील उभे पिक नष्ट केले. ही कारवाई करताना वन विभागाच्या जवळ अतिक्रमण हटविण्याचे कोणतेच आदेश नाही. गोंदिया न्यायालयाने तिलकचंद लिल्हारेचा अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणाची १९ जून १४ गोंदिया येथे पेशी आहे. मात्र निर्दयी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी कोणतीही राजरोषपणे पोलिसाचा कर्मचार्‍याचा ताफा घेऊन हाती येणारे धानपिक नष्ट केले. यात सदर शेतकर्‍याचा ६0 ते ७0 हजाराचे नुकसान झाले.

दोन वर्षापूर्वी सावंगी येथे ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात तिलकचंद लिल्हारे, खेलचंद, गेलचंद, फुलचंद या सर्वांंनी गावात ज्याचा दबदबा आहे. त्याला मतदान केले नाही व त्या व्यक्तीचा निवडणूकीत पराभव झाला. ५00 ते ६00 लोकसंख्या असलेल्या गावात संपूर्ण गाव एका बाजूला व लिल्हारे कुटूंब एका बाजूला होते. त्यात वनहक्क समितीचे सचिव व वन सरंक्षण अध्यक्ष याच्या दबावतंत्राने हा प्रकार घडल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर या लिल्हारे कुटूंबियाचे लहान मुले शेजारच्या गावी शिक्षण घेण्याकरिता जात आहेत. त्यांना विरोधकांमुळे आमच्याशी बोलायचे नाही, असे सांगून त्यांची हेटाळणी करतात. वनविभागाची कारवाई थांबविण्याकरीता १0 ते २0 हजाराची मागणी केल्याचे तक्रारकर्त्यानी सांगीतले. या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी माणुसकी दाखविली नाही. पीडित कुटुंबातील लहान मुलाना सालेकसा पोलिसानी बाजीरावचा दणका दिला. पोलिसाकडून त्यांना धमक्या दिल्या गेल्या. विशेष म्हणजे १८ एकर जागेवर अतिक्रमण असताना उर्वरीत लोकावर कारवाई करण्यात आली नाही. धान पिकावर वनविभागाची ही दंडूकशाही पोलिसानी मुक आणि बधीर होऊन पाहीली. या प्रकरणात वनविभागाचे अधिकारी ठवकर यांच्याकडे सुपूर्द केला. (तालुका प्रतिनिधी)