शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अतिमुसळधार पावसाचा ‘फोरकास्ट', जिल्ह्याला रेड अलर्ट; आतापर्यंत फक्त २६ टक्केच बरसला

By कपिल केकत | Updated: July 18, 2024 20:26 IST

गोंदिया जिल्ह्यावर यंदा वरूणराज नाराज दिसून येत आहे.

गोंदिया : पावसाळ्याला दीड महिना लोटला असूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांसह अवघ्या जिल्हावासीयांचीच धाकधूक वाढली आहे. असे असतानाच मात्र हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ‘फोरकास्ट’ दिला आहे. आतापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने पावसाची गरज असल्याने सर्वांच्या नजरा आता हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यावर यंदा वरूणराज नाराज दिसून येत आहे. हेच कारण आहे की, पावसाळ्याला दीड महिना लोटला असूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त सरासरी ३२१.७ मि.मी. एवढाच पाऊस बरसला असून त्याची २६.४ एवढी टक्केवारी आहे. पाऊस नसल्यामुळे आताही जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांची रोवणी आटोपलेली नाही. असे असतानाच मात्र हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर शनिवारी (दि.२०) ऑरेंज अलर्ट दिला असून त्यातूनही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

उकाड्याने जिल्हावासीय हैराणआतापर्यंत पावसाचा जोर वाढलेला नसल्याने उकाडा काही कमी झालेला नाही. परिणामी पावसाळा लागून दीड महिना लोटला असातानाही कुलर व पंख्यांशिवाय राहणे कठीण झाले आहे. जिल्ह्याचा पारा गुरूवारी ३३.२ अंशांवर होता व मागील कित्येक दिवसांपासून पारा ३२-३३ अंशांवर कायम आहे. परिणामी आताही नागरिकांच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस