शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

अतिमुसळधार पावसाचा ‘फोरकास्ट', जिल्ह्याला रेड अलर्ट; आतापर्यंत फक्त २६ टक्केच बरसला

By कपिल केकत | Updated: July 18, 2024 20:26 IST

गोंदिया जिल्ह्यावर यंदा वरूणराज नाराज दिसून येत आहे.

गोंदिया : पावसाळ्याला दीड महिना लोटला असूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांसह अवघ्या जिल्हावासीयांचीच धाकधूक वाढली आहे. असे असतानाच मात्र हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ‘फोरकास्ट’ दिला आहे. आतापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने पावसाची गरज असल्याने सर्वांच्या नजरा आता हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यावर यंदा वरूणराज नाराज दिसून येत आहे. हेच कारण आहे की, पावसाळ्याला दीड महिना लोटला असूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त सरासरी ३२१.७ मि.मी. एवढाच पाऊस बरसला असून त्याची २६.४ एवढी टक्केवारी आहे. पाऊस नसल्यामुळे आताही जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांची रोवणी आटोपलेली नाही. असे असतानाच मात्र हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर शनिवारी (दि.२०) ऑरेंज अलर्ट दिला असून त्यातूनही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

उकाड्याने जिल्हावासीय हैराणआतापर्यंत पावसाचा जोर वाढलेला नसल्याने उकाडा काही कमी झालेला नाही. परिणामी पावसाळा लागून दीड महिना लोटला असातानाही कुलर व पंख्यांशिवाय राहणे कठीण झाले आहे. जिल्ह्याचा पारा गुरूवारी ३३.२ अंशांवर होता व मागील कित्येक दिवसांपासून पारा ३२-३३ अंशांवर कायम आहे. परिणामी आताही नागरिकांच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस