शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पुराचा ३० गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

रविवारी पावसाचा जोर ओसरल्या जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने २० गावे अद्यापही पाण्याखाली होती. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला, कासा, बाम्हणटोला, महालगाव, मुरदाडा व तिरोडा तालुक्यातील धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी, ढिवरटोला, सावरा, घाटकुरोडा या गावांचा संपर्क अद्यापही तालुक्यापासून तुटलेला होता. पूर परिस्थिती लक्षात घेता नदी काठलगतच्या गावांमधील १२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही संपर्क तुटलेलाच : मदत कार्य सुरू : १२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. या दोन्ही तालुक्यातील २० गावांचा संपर्क रविवारी (दि.३०) सलग दुसऱ्या दिवशी तुटलेला होता.आपत्ती व्यवस्थापन विभागाने या गावांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून १३६ नागरिकांना सुखरुपणे बाहेर काढले. तर पूर परिस्थिती लक्षात घेता १२८२ नागरिकांना शाळा आणि समाज मंदिरांमध्ये हलविण्यात आले आहे.रविवारी पावसाचा जोर ओसरल्या जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने २० गावे अद्यापही पाण्याखाली होती. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला, कासा, बाम्हणटोला, महालगाव, मुरदाडा व तिरोडा तालुक्यातील धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी, ढिवरटोला, सावरा, घाटकुरोडा या गावांचा संपर्क अद्यापही तालुक्यापासून तुटलेला होता. पूर परिस्थिती लक्षात घेता नदी काठलगतच्या गावांमधील १२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने शाळा आणि समाज मंदिरामध्ये करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सलग दुसºया दिवशी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात रेस्क्यू ऑपरेशन राबववून पूरग्रस्त गावात अडकलेल्या गावकऱ्यांना बोटीव्दारे बाहेर काढले. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या गावांना पुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर असून नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. पुराचा सर्वाधिक फटका धान पिकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली असल्याने ती सडण्याची आणि वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मध्यप्रदेशातील पावसाने महाराष्ट्रात पूर परिस्थितीमागील तीन चार दिवसांपासून मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी (दि.२९) संजय सरोवराचे १० दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.परिणामी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील एकूण ३० गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली.पाऊस ओसरला तरी सतर्कतेचा इशाराजिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे काही भागातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.घरांची पडझड सुरूचजिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेकडो घर मागील दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पण काही गावांमध्ये अद्यापही पूर परिस्थिती असल्याने या भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही.इटियाडोह धरण ओव्हर फ्लो च्या उंबरठ्यावरमागील तीन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवेगावबांध जलाशय ओव्हर फ्लो झाले असून रविवारी इटियाडोह धरण सुध्दा ९८ टक्के भरले असल्याने ते कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे धरण क्षेत्रात येणाºया गावकºयांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर