शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यात संततधार सुरूच, नदीनाल्यांना आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 05:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुुडुंब भरुन वाहत होते. तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, परसवाडा परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेली रोवणी वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी (दि. १३) दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यात आठही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर दोन मार्गांवरील पूल  वाहून गेल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. हवामान विभागाने जिल्ह्यात १० ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे नदीनाले तुुडुंब भरुन वाहत होते. तर वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, परसवाडा परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी केलेली रोवणी वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८३.३ मिमी पावसाची नोंद झाली असून आठही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधार पावसामुळे बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रोवणीची कामे काही प्रमाणात खोळंबली होती. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत कायम होता. त्यामुळे नदी काठालगतच्या गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होवू शकते.  

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर