शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाच गावांचा पाणी पुरवठा ‘कट’

By admin | Updated: May 30, 2016 01:35 IST

आमगाव तालुक्याच्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव तालुक्यातील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो.

बनगाव योजनेचे ३३ लाख थकीत : पैसे न भरणाऱ्यांची यादी जाहीर करा गोंदिया : आमगाव तालुक्याच्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव तालुक्यातील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचे बील न भरल्यामुळे या २६ गावांपैकी पाच गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. ७० टक्यांपेक्षा अधिक बील थकीत असणाऱ्या पाच गावांत साखरीटोला, पदमपूर, चिरचाळबांध, खुर्शीपार व कातुर्ली या गावांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातील २६ तर सालेकसा तालुक्यातील चार गावांना या योजनेतून पाणी पूरवठा करण्यात येतो. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींनी पाण्याच्या बिलाची वसूली न केल्यामुळे या ग्राम पंचायतींवर ३३ लाख २६ हजार ४४ रूपयांची थकबाकी आहे. यात आमगाव तालुक्यातील बोरकन्हार या ग्रामपंचायतकडे १ लाख ३८ हजार ४८० रूपये, बाम्हणी या ग्रामपंचायतवर ८८ हजार ९६० रूपये, पदमपूर १ लाख ५४ हजार ६८० रूपये, रिसामा ४ लाख ६६ हजार ७८० रूपये, बिरसी ६५ हजार ३०० रूपये, बनगाव ३ लाख ६८ हजार ८२० रूपये, किडंगीपार ९८ हजार ४६० रूपये, शिवणी एक लाख ३४ हजार, चिरचाळबांध एक लाख ९८ हजार ८५० रूपये, खुर्शीपार एक लाख ९५ हजार ४३८ रूपये, जवरी ७६ हजार ४० रूपये, मानेगाव ७४ हजार २०० रूपये, ठाणा ३१ हजार ४० रूपये, बोथली ३० हजार ५३० रूपये, सुपलीपार ३३ हजार ५२२ रूपये, किकरीपार ५० हजार ७७० रूपये, कातुर्ली २ लाख २९ हजार ८२२ रूपये, मोहगाव ७ हजार ४१० रूपये, बंजारीटोला ४८ हजार, ननसरी ३१ हजार ६०० रूपये, सरकारटोला ७८ हजार ७८० रूपये, घाटटेमणी एक लाख ३१ हजार ४३० रूपये, पानगाव ८७ हजार २२० रूपये, फुक्कीमेटा ७ हजार ४८० रूपये, आमगाव १२ हजार ६७२ रूपये तर सालेकसा तालुक्यातील साखरीटोला २ लाख १४ हजार १६० रूपये, कारूटोला १ लाख ३८ हजार ३० रूपये, सातगाव ५० हजार ६८० व हेटी ग्रामपंचायतवर १ लाख १ हजार ४६० रूपये थकीत आहेत.यातील ७० टक्यांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पाच गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर थकबाकीदारांची यादी जाहीर करा अशी मागणीही नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)चार गावे पुन्हा रडारवर७० टक्यांपेक्षा अधिक पाण्याचे बील थकीत असणाऱ्या गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. तीन दिवसांपासून पाच गावांतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला तर पुन्हा घाटटेमणी, कारूटोला, मानेगाव व बोरकन्हार या चार गावांतील पाणी २ जूनपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामपंचायतींनी थकीत बिलाची रक्कम न भरल्यामुळे पाणी पूरवठा बंद करण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता उत्तम शिंदे यांनी सांगितले. पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी?या योजनेंतर्गत पाणी वाटपासाठी गावागावात ठेवण्यात आलेले काही व्यक्ती गावातील लग्न समारंभात, तेरवीच्या कार्यक्रमात त्या कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तीकडून २०० ते ५०० रूपये घेऊन पाणी देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते व बिल ग्रामपंचायतचे वाढते. पाणी सोडण्याची वेळ निश्चीत असावा. केव्हाही पाणी सोडले जाते, अशा तक्रारी संबंधित योजनेच्या अभियंत्यांना देण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडूनही कारवाई करण्यात आली नाही. पाणी वाटप करणारे व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी अख्या गावावर पाण्याच्या पैशांचा भूर्दंड बसवित आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.ग्रामपंचायतने नळ कनेक्शन धारकांकडून वेळीच पाण्याची वसूली करावी. नळ कनेक्शन धारकांना फक्त शंभर रूपयांत शुध्द पाण्याचा पूरवठा होतो त्यांनीही आपली जबाबदारी ओळखून पाण्याचे पैसे ग्रामपंचायतीला द्यावे. जेणेकरून योजना चालविण्यात अडचण येणार नाही. - उषाताई मेंढे जि.प. अध्यक्ष तथा जि.प.सदस्य पदमपूर.