शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांचा पाणी पुरवठा ‘कट’

By admin | Updated: May 30, 2016 01:35 IST

आमगाव तालुक्याच्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव तालुक्यातील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो.

बनगाव योजनेचे ३३ लाख थकीत : पैसे न भरणाऱ्यांची यादी जाहीर करा गोंदिया : आमगाव तालुक्याच्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून आमगाव तालुक्यातील २६ गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचे बील न भरल्यामुळे या २६ गावांपैकी पाच गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. ७० टक्यांपेक्षा अधिक बील थकीत असणाऱ्या पाच गावांत साखरीटोला, पदमपूर, चिरचाळबांध, खुर्शीपार व कातुर्ली या गावांचा समावेश आहे.आमगाव तालुक्यातील २६ तर सालेकसा तालुक्यातील चार गावांना या योजनेतून पाणी पूरवठा करण्यात येतो. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींनी पाण्याच्या बिलाची वसूली न केल्यामुळे या ग्राम पंचायतींवर ३३ लाख २६ हजार ४४ रूपयांची थकबाकी आहे. यात आमगाव तालुक्यातील बोरकन्हार या ग्रामपंचायतकडे १ लाख ३८ हजार ४८० रूपये, बाम्हणी या ग्रामपंचायतवर ८८ हजार ९६० रूपये, पदमपूर १ लाख ५४ हजार ६८० रूपये, रिसामा ४ लाख ६६ हजार ७८० रूपये, बिरसी ६५ हजार ३०० रूपये, बनगाव ३ लाख ६८ हजार ८२० रूपये, किडंगीपार ९८ हजार ४६० रूपये, शिवणी एक लाख ३४ हजार, चिरचाळबांध एक लाख ९८ हजार ८५० रूपये, खुर्शीपार एक लाख ९५ हजार ४३८ रूपये, जवरी ७६ हजार ४० रूपये, मानेगाव ७४ हजार २०० रूपये, ठाणा ३१ हजार ४० रूपये, बोथली ३० हजार ५३० रूपये, सुपलीपार ३३ हजार ५२२ रूपये, किकरीपार ५० हजार ७७० रूपये, कातुर्ली २ लाख २९ हजार ८२२ रूपये, मोहगाव ७ हजार ४१० रूपये, बंजारीटोला ४८ हजार, ननसरी ३१ हजार ६०० रूपये, सरकारटोला ७८ हजार ७८० रूपये, घाटटेमणी एक लाख ३१ हजार ४३० रूपये, पानगाव ८७ हजार २२० रूपये, फुक्कीमेटा ७ हजार ४८० रूपये, आमगाव १२ हजार ६७२ रूपये तर सालेकसा तालुक्यातील साखरीटोला २ लाख १४ हजार १६० रूपये, कारूटोला १ लाख ३८ हजार ३० रूपये, सातगाव ५० हजार ६८० व हेटी ग्रामपंचायतवर १ लाख १ हजार ४६० रूपये थकीत आहेत.यातील ७० टक्यांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पाच गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर थकबाकीदारांची यादी जाहीर करा अशी मागणीही नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)चार गावे पुन्हा रडारवर७० टक्यांपेक्षा अधिक पाण्याचे बील थकीत असणाऱ्या गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. तीन दिवसांपासून पाच गावांतील पाणी पुरवठा बंद करण्यात आला तर पुन्हा घाटटेमणी, कारूटोला, मानेगाव व बोरकन्हार या चार गावांतील पाणी २ जूनपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामपंचायतींनी थकीत बिलाची रक्कम न भरल्यामुळे पाणी पूरवठा बंद करण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता उत्तम शिंदे यांनी सांगितले. पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी?या योजनेंतर्गत पाणी वाटपासाठी गावागावात ठेवण्यात आलेले काही व्यक्ती गावातील लग्न समारंभात, तेरवीच्या कार्यक्रमात त्या कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तीकडून २०० ते ५०० रूपये घेऊन पाणी देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते व बिल ग्रामपंचायतचे वाढते. पाणी सोडण्याची वेळ निश्चीत असावा. केव्हाही पाणी सोडले जाते, अशा तक्रारी संबंधित योजनेच्या अभियंत्यांना देण्यात आल्या. परंतु त्यांच्याकडूनही कारवाई करण्यात आली नाही. पाणी वाटप करणारे व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी अख्या गावावर पाण्याच्या पैशांचा भूर्दंड बसवित आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.ग्रामपंचायतने नळ कनेक्शन धारकांकडून वेळीच पाण्याची वसूली करावी. नळ कनेक्शन धारकांना फक्त शंभर रूपयांत शुध्द पाण्याचा पूरवठा होतो त्यांनीही आपली जबाबदारी ओळखून पाण्याचे पैसे ग्रामपंचायतीला द्यावे. जेणेकरून योजना चालविण्यात अडचण येणार नाही. - उषाताई मेंढे जि.प. अध्यक्ष तथा जि.प.सदस्य पदमपूर.