शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पहिल्याच दिवशी पाच शाळांची वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी अडचणी येत आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकूण २७ पैकी जेमतेम पाच शाळा सुरु झाल्या. यात दोन माध्यमिक शाळा आणि तीन प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देतालुक्यात एकूण २७ शाळा : पालकांच्या संमती पत्राची प्रतीक्षा

विजय मानकर  लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (दि.१५) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. तालुक्यातील एकूण २७ शाळांपैकी पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात केवळ ५ शाळा सुरु झाल्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळांमध्ये मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. तर तब्बल दीड वर्षानंतर शाळेचे प्रत्यक्षात दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी अडचणी येत आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकूण २७ पैकी जेमतेम पाच शाळा सुरु झाल्या. यात दोन माध्यमिक शाळा आणि तीन प्राथमिक शाळेतील आठव्या वर्गांचा समावेश आहे. ग्रामीण भागात ज्या गावामध्ये मागील एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण नाही अशा गावात ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावानुसार शाळा सुरु करता येईल असे आदेश शासनाने काढले आहे. ठराव दिल्यास १५ जुलैपासून शाळा सुरु करावी. ज्यात ८ वी ते १२ पर्यंत किंवा त्यापैकी कोणतेही वर्ग असतील अशी शाळा सुरु करावी असे आदेश दिले. शाळा सुरु करण्याचा चेंडू ग्रामपंचायतच्या कोर्टात टाकला. प्राथमिक शाळांमध्ये आठव्या वर्गात त्या गावचेच विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु ज्या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जेथे बारावीपर्यंत वर्ग असतात त्या शाळांमध्ये इतर गावाचे विद्यार्थी सुध्दा येतात. तेथे येणारे विद्यार्थी ५ ते १० किमी पेक्षा जास्त अंतरावरचे सुध्दा असतात. अशात त्या शाळांना तसा ठराव मिळणे कठीण असते. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा पेच निर्माण झालेला आहे. तालुक्यातील बिंझली, बोदलबोडी आणि झालीया येथील प्राथमिक तर निंबा आणि मक्काटोला येथील माध्यमिक शाळा गुरुवारी पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या. तर इतर शाळांना ग्रामपंचायतचा ठराव आणि पालकांच्या संमतीपत्राची प्रतीक्षा आहे. 

टप्प्या टप्प्याने सुरु होणार शाळा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला असून पालक सुध्दा आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी अनुकूल होत आहेत. त्यामुळेच गुरुवारी जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायती व समित्यांनी शाळा सुरु करण्याचे ठराव पारित केले आहे. येत्या आठवडाभरात आणखी ठराव पारित होण्याची शक्यता असून टप्प्या टप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. गुरुवारपासून काही शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. 

शासन निर्णय ७ जुलै मधील समित्यांद्वारा निर्णय घेऊनच शाळा सुरु कराव्यात. विना समिती विना ठराव शाळा सुरु करु नये असे निर्देश शाळांना दिले आहे. - एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी पं.स.सालेकसा

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या