शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

पाच महिन्यात समन्वयातून सुटले ४६११ तंटे

By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत.

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत. राज्य शासनाने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील हजार तंटे सामोपचाराने सोडविण्यात आले. तंटामुक्त मोहीम आल्यापासून ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपले भांडण, तंटे गावातच सोडवितात. अनेक लोक ही मोहीम आल्यापासून पोलीस ठाणे किंवा न्यायालयाची पायरी चढत नाही. गावात शांतता नांदावी, नवीन तंटे उद्भवू नये यासाठी तंटामुक्त समिती अविरत प्रयत्न करीत आहे. तंटामुक्त समितीने प्रयत्न केल्यावरही भांडण, तंटे तर ते तंटे गावातल्या गावात सामोपचाराने सोडविले जातात. याचाच परिणाम गोंदिया जिल्हा तंटामुक्त होऊन तीन वर्षाचा काळ लोटूनही मोहीम राबविणाऱ्या समित्यांनी तंटे सोडविण्याची गती सुरूच ठेवली आहे. २०१४ च्या पाच महिन्यात दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर अशा स्वरूपाचे तंटे दाखल करून गावगाड्यातून तंट्याचा निपटारा करण्यात आला. दिवाणी स्वरूपाचे चार तंटे दाखल करून एक तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. महसूली स्वरूपाची ६ तंटे दाखल करून २ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. फौजदारी स्वरूपाची ६९६१ तंटे दाखल करून ४ हजार ६०८ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. इतर स्वरूपाचा एक तंटा दाखल करण्यात आला मात्र त्या तंट्याचा निपटारा करण्यात आला नाही. मागील पाच महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी ६ हजार ९७२ तंटे दाखल करून ४ हजार ६११ तंटे समन्वयातून सोडविण्यात आले. शांततेत तंटे सोडवून गावात शांततेतून समृध्दी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)