शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पाच महिन्यात समन्वयातून सुटले ४६११ तंटे

By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत.

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत. राज्य शासनाने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील हजार तंटे सामोपचाराने सोडविण्यात आले. तंटामुक्त मोहीम आल्यापासून ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपले भांडण, तंटे गावातच सोडवितात. अनेक लोक ही मोहीम आल्यापासून पोलीस ठाणे किंवा न्यायालयाची पायरी चढत नाही. गावात शांतता नांदावी, नवीन तंटे उद्भवू नये यासाठी तंटामुक्त समिती अविरत प्रयत्न करीत आहे. तंटामुक्त समितीने प्रयत्न केल्यावरही भांडण, तंटे तर ते तंटे गावातल्या गावात सामोपचाराने सोडविले जातात. याचाच परिणाम गोंदिया जिल्हा तंटामुक्त होऊन तीन वर्षाचा काळ लोटूनही मोहीम राबविणाऱ्या समित्यांनी तंटे सोडविण्याची गती सुरूच ठेवली आहे. २०१४ च्या पाच महिन्यात दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर अशा स्वरूपाचे तंटे दाखल करून गावगाड्यातून तंट्याचा निपटारा करण्यात आला. दिवाणी स्वरूपाचे चार तंटे दाखल करून एक तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. महसूली स्वरूपाची ६ तंटे दाखल करून २ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. फौजदारी स्वरूपाची ६९६१ तंटे दाखल करून ४ हजार ६०८ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. इतर स्वरूपाचा एक तंटा दाखल करण्यात आला मात्र त्या तंट्याचा निपटारा करण्यात आला नाही. मागील पाच महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी ६ हजार ९७२ तंटे दाखल करून ४ हजार ६११ तंटे समन्वयातून सोडविण्यात आले. शांततेत तंटे सोडवून गावात शांततेतून समृध्दी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)