शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाचवीच्या भूगोलाचे पाच धडे गायब

By admin | Updated: August 1, 2015 02:10 IST

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही ..

सदोष पुस्तकांचे वापट : शिक्षण विभाग अनभिज्ञगोरेगाव : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही पुस्तकातील पाच धडेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. स्थानिक शहीद जान्या-तिम्या जि.प.शाळेत असे सदोष पुस्तक विद्यार्थ्याना वाटप झाल्याचे आढळले. या प्रकारामुळे शिक्षण विभागाकडून प्रकाशित पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे ही बाब त्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतू शिक्षकाने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत शाळेकडून कोणतीही तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली नाही. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार राज्याचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत २०१३-१४ या शालेय वर्षापासून भूगोल विषयाचे हे पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यातील काही पुस्तकातील मधातले पाच धडेच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक साऱ्या महाराष्ट्रात वाटल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन कसे करावे असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडला आहे. या पुस्तकातून गायब झालेले पाच धडे कसे काय गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे. हा मुद्रणकीत दोष असला तरी तो कसा झाला? याची चौकशी होणार का? असे प्रश्न काही पालकांनी उपस्थित केले. पाच धडे गायब असल्याचा प्रकार जाम्या-तिम्या शाळेतील प्रतिक राज बोम्बार्डे या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. यावर विद्यार्थ्यांने सदर बाब वर्ग शिक्षकांच्या लक्षात आणून दिली. पण वर्ग शिक्षकाने काही नाही होत असे बोलून त्याकडे दुर्लक्ष केले आणि ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिक बोम्बार्डे या विद्यार्थ्यांने सदर बाब आपल्या पालकाला सांगितली. यावर पालक राज बोम्बार्डे यांनी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे याबाबत तोंडी तक्रार केली.गोंदिया जिल्ह्यात भूगोल विषयाच्या पाचव्या वर्गासाठी लाखो पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यातील किती पुस्तके दोषपूर्ण आहेत याविषयी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागात अशाच पद्धतीने सदोष पुस्तकांचे वाटप झाले असण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)