शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीच्या भूगोलाचे पाच धडे गायब

By admin | Updated: August 1, 2015 02:10 IST

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही ..

सदोष पुस्तकांचे वापट : शिक्षण विभाग अनभिज्ञगोरेगाव : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या वतीने निर्मित पाचव्या वर्गाच्या भूगोल विषयाच्या काही पुस्तकातील पाच धडेच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. स्थानिक शहीद जान्या-तिम्या जि.प.शाळेत असे सदोष पुस्तक विद्यार्थ्याना वाटप झाल्याचे आढळले. या प्रकारामुळे शिक्षण विभागाकडून प्रकाशित पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे ही बाब त्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतू शिक्षकाने ही बाब गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत शाळेकडून कोणतीही तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आलेली नाही. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार राज्याचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत २०१३-१४ या शालेय वर्षापासून भूगोल विषयाचे हे पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यातील काही पुस्तकातील मधातले पाच धडेच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक साऱ्या महाराष्ट्रात वाटल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन कसे करावे असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडला आहे. या पुस्तकातून गायब झालेले पाच धडे कसे काय गायब झाले हा संशोधनाचा विषय आहे. हा मुद्रणकीत दोष असला तरी तो कसा झाला? याची चौकशी होणार का? असे प्रश्न काही पालकांनी उपस्थित केले. पाच धडे गायब असल्याचा प्रकार जाम्या-तिम्या शाळेतील प्रतिक राज बोम्बार्डे या पाचव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. यावर विद्यार्थ्यांने सदर बाब वर्ग शिक्षकांच्या लक्षात आणून दिली. पण वर्ग शिक्षकाने काही नाही होत असे बोलून त्याकडे दुर्लक्ष केले आणि ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिक बोम्बार्डे या विद्यार्थ्यांने सदर बाब आपल्या पालकाला सांगितली. यावर पालक राज बोम्बार्डे यांनी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे याबाबत तोंडी तक्रार केली.गोंदिया जिल्ह्यात भूगोल विषयाच्या पाचव्या वर्गासाठी लाखो पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत. यातील किती पुस्तके दोषपूर्ण आहेत याविषयी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. ग्रामीण भागात अशाच पद्धतीने सदोष पुस्तकांचे वाटप झाले असण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)