शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिरसी विमानतळावरून ‘टेक ऑफ’ला ग्रहण; १२ दिवसात पाच विमानाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 12:10 IST

सेवा सुरू होऊन १२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून, तब्बल पाचवेळा खराब हवामानामुळे या विमानतळावर विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही.

ठळक मुद्देखराब वातावरणाचा परिणाम

गोंदिया : बिरसी विमानतळावरून १३ मार्चपासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झाला. मात्र खराब हवामानामुळे मागील १२ दिवसांच्या कालावधीत तब्बल पाचवेळा विमानाला विलंब झाला. परिणामी त्याचा प्रवाशांना फटका बसला. विमानाला विलंब होण्यास खराब वातावरण पुढे केले जात असले तरी, या विमानतळावरून प्रशिक्षणार्थी पायलट नियमित उड्डाण घेत असल्याने दिल्या जाणाऱ्या कारणावर शंका व्यक्त केली जात आहे.

बिरसी विमानतळावरून १३ मार्चपासून हैदराबाद-गोंदिया-इंदूर व इंदूर-गोंदिया-हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू होऊन १२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून, तब्बल पाचवेळा खराब हवामानामुळे या विमानतळावर विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. गुरुवारी (दि.२४) दुपारी १.३० वाजतापर्यंत प्रवासी इंदूरला पोहोचूू शकले नाही. बिरसी विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी न मिळाल्याने, हे विमान एक ते दीड तास हवेतच होते. त्यानंतर हे विमान थेट इंदूरला गेले. परिणामी, गोंदियावरून इंदूरला जाणाऱ्या २५ प्रवाशांना बिरसी विमानतळावरून घरी परतावे लागले.

हैदराबादवरून गोंदियाला सकाळी ८.१० ला विमान पोहोचण्याची वेळ असून, त्यानंतर हेच विमान ८.३५ वाजता इंदूरला जाते. त्यानंतर इंदूरहून सकाळी १०.२० वाजता उड्डाण घेऊन गोंदियाला ११.३५ वाजता पोहोचते. मात्र पाचवेळा तब्बल विमानाला विलंब झाल्याने दिल्ली, अहमदाबाद व चेन्नई येथे जाणाऱ्या प्रवासी विमानाला विलंब झाल्याने कनेक्टिंग विमान पकडू शकले नाही. तर शुक्रवारी(दि.२५)सुद्धा हैदराबादहून येणारे विमान दुपारी १२ वाजता बिरसी विमानतळावर पोहोचले.

इन्स्ट्रूमेंट लँडिंगची सुविधा नाही

बिरसी विमानतळावरुन इन्स्ट्रूमेंट लँडिंगची सिस्टम(आयएलएफ)ची व्यवस्था नसल्याने खराब वातावरणात विमान उतरविले जात नाही. बिरसी येथील पायलट प्रशिक्षण केंद्र असून, पायलट दररोज सकाळी नियमित उड्डाण घेत आहे. विशेष म्हणजे, हिवाळ्यात काही शहरांमध्ये धुक्याची समस्या राहते. मात्र गोंदिया विमानतळावर ही समस्या येत नाही. मात्र प्रवासी विमान वाहतूक सेवेला खराब वातावरणाचा फटका बसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खराब वातावरणामुळेच विमानास लँडिंग करण्यास विलंब होत आहे. प्रवाशांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. पण प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल खंत आहे.

- देवेंद्र गोस्वामी, प्रभारी संचालक बिरसी विमानतळ.

टॅग्स :Airportविमानतळgondiya-acगोंदिया