शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बिरसी विमानतळावरून ‘टेक ऑफ’ला ग्रहण; १२ दिवसात पाच विमानाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 12:10 IST

सेवा सुरू होऊन १२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून, तब्बल पाचवेळा खराब हवामानामुळे या विमानतळावर विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही.

ठळक मुद्देखराब वातावरणाचा परिणाम

गोंदिया : बिरसी विमानतळावरून १३ मार्चपासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झाला. मात्र खराब हवामानामुळे मागील १२ दिवसांच्या कालावधीत तब्बल पाचवेळा विमानाला विलंब झाला. परिणामी त्याचा प्रवाशांना फटका बसला. विमानाला विलंब होण्यास खराब वातावरण पुढे केले जात असले तरी, या विमानतळावरून प्रशिक्षणार्थी पायलट नियमित उड्डाण घेत असल्याने दिल्या जाणाऱ्या कारणावर शंका व्यक्त केली जात आहे.

बिरसी विमानतळावरून १३ मार्चपासून हैदराबाद-गोंदिया-इंदूर व इंदूर-गोंदिया-हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू होऊन १२ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असून, तब्बल पाचवेळा खराब हवामानामुळे या विमानतळावर विमान उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. गुरुवारी (दि.२४) दुपारी १.३० वाजतापर्यंत प्रवासी इंदूरला पोहोचूू शकले नाही. बिरसी विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी न मिळाल्याने, हे विमान एक ते दीड तास हवेतच होते. त्यानंतर हे विमान थेट इंदूरला गेले. परिणामी, गोंदियावरून इंदूरला जाणाऱ्या २५ प्रवाशांना बिरसी विमानतळावरून घरी परतावे लागले.

हैदराबादवरून गोंदियाला सकाळी ८.१० ला विमान पोहोचण्याची वेळ असून, त्यानंतर हेच विमान ८.३५ वाजता इंदूरला जाते. त्यानंतर इंदूरहून सकाळी १०.२० वाजता उड्डाण घेऊन गोंदियाला ११.३५ वाजता पोहोचते. मात्र पाचवेळा तब्बल विमानाला विलंब झाल्याने दिल्ली, अहमदाबाद व चेन्नई येथे जाणाऱ्या प्रवासी विमानाला विलंब झाल्याने कनेक्टिंग विमान पकडू शकले नाही. तर शुक्रवारी(दि.२५)सुद्धा हैदराबादहून येणारे विमान दुपारी १२ वाजता बिरसी विमानतळावर पोहोचले.

इन्स्ट्रूमेंट लँडिंगची सुविधा नाही

बिरसी विमानतळावरुन इन्स्ट्रूमेंट लँडिंगची सिस्टम(आयएलएफ)ची व्यवस्था नसल्याने खराब वातावरणात विमान उतरविले जात नाही. बिरसी येथील पायलट प्रशिक्षण केंद्र असून, पायलट दररोज सकाळी नियमित उड्डाण घेत आहे. विशेष म्हणजे, हिवाळ्यात काही शहरांमध्ये धुक्याची समस्या राहते. मात्र गोंदिया विमानतळावर ही समस्या येत नाही. मात्र प्रवासी विमान वाहतूक सेवेला खराब वातावरणाचा फटका बसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

खराब वातावरणामुळेच विमानास लँडिंग करण्यास विलंब होत आहे. प्रवाशांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. पण प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल खंत आहे.

- देवेंद्र गोस्वामी, प्रभारी संचालक बिरसी विमानतळ.

टॅग्स :Airportविमानतळgondiya-acगोंदिया