शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगड येथील पाच कुटुंबांचे जीर्ण घरात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

इसापूर : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील पाच कुटुंब पडक्या घरात वास्तव्य करीत आहे. मात्र त्यांना अर्ज करूनसुद्धा घरकुल ...

इसापूर : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील पाच कुटुंब पडक्या घरात वास्तव्य करीत आहे. मात्र त्यांना अर्ज करूनसुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे. याची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड, जरुघाटा, चिचोली येथे सन २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड येथील पाच जणांच्या घराची पूर्णतः पडझड झाली होती. अतिवृष्टीने घराची पडझड झाल्याने त्याच रात्री त्या कुटुंबांनी प्रतापगड येथील भक्ती निवासात आश्रय घेतला होता. त्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा दक्षता समितीचे पदाधिकारी, तहसीलदार यांनी मोका पंचनामा करून या प्रतापगड येथील पाच कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी निवड केली होती. पण चार वर्षं लोटूनही त्या त्यांना कुठलीही मदत अथवा घरकुल देण्यात आले नाही. प्रतापगड येथील महिला वर्षा इबा झिलपे मुकी असून, पती दिव्यांग आहे. त्यांना दोन मुले असून, मोलमजुरी करूनच त्यांचा उरदनिर्वाह चालतो. त्यांनादेखील जीर्ण घरात उदनिर्वाह करावा लागत आहे. जरुघाटा गाव प्रतापगड ग्रामपंचायत अंतर्गत येत असून, जरुघाटा येथे अतिवृष्टी व ढगफुटीने शंकर नकटू ऊईके यांचे कुटुंब मागील ३५ वर्षांपासून गवताचे झोपडीमध्ये वास्तव्य करीत आहेत. दहा वर्षांपासून घरकुलाची मागणी असून, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. शंकर ऊईके यांनी सांगितले की, सन २०१६च्या अतिवृष्टी व ढगफुटीने आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. जरुघाटा येथील चंद्रकला बकाराम बावने व बकाराम गोविंदा बावने हे वृद्ध असून, झोपडीत वास्तव्य करीत आहेत. मागील पावसाळ्यात रात्रभर चारही बाजूचे ओलाव्याने रात्र जागून काढली. पण या गरीब कुटुंबाना अजूनही घरकुल मिळालेले नाही. २०२२ पर्यंत गरीब कुटुंब घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून घरकुल योजना राबवित आहे. मात्र आजही ही पाच कुटुंबे घरकुल योजनेपासून वंचित आहेत.

......

स्थानिक अधिकाऱ्यांकडून घरकुल योजनेचा बट्याबोळ

केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजनांतर्गत गरीब कुटुंबांसाठी घरकुल योजना राबविण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२पर्यंत पक्के घर मिळावे, कोणीही घरापासून वंचित राहू नये म्हणून घरकुल योजना सुरू केली. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, सबरी योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ गरीब कुटुंबाना दिला जातो. पण स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुलर्क्षित धोरणामुळे योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.

.....

घर तिथे शौचालय ही योजना कागदावरच

केंद्र व राज्य शासनाने घर तिथे शौचालय ही योजनाही कागदावरच राबविली जात असल्याचे चित्र आहे. या योजनेचा लाभ सधन लोकांनाच देण्यात आला. ज्यांच्याकडे शौचालय आहेत त्यांनाच शौचालय मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात ३० टक्के गावातील लोकांकडे शौचालय नाहीत. जरुघाटावरून चार किमी अंतरावरील करांडली, बोंडगाव, सुरबंद येथील कुटुंब शौचालयापासून वंचित आहे.