शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाच एकरातील रोवणी सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आमगावचे अभियंता यांच्याकडे केली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच एकरातील रोवणी सडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी केली होती तक्रार : पाटबंधारे विभागाने द्यावी नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पुजारीटोला धरणातून वाहून जाणाऱ्या कालव्याचे पाईप दुरूस्त न केल्याने आठ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहून जात आहे. परिणामी पाच एकरातील रोवणी सडल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.रामाटोला (अंजोरा) येथील गट क्रमांक ७०१ मधून कालव्याचे पाणी जाण्यासाठी कालव्याला पाईप बसविण्यात आले आहे. या कालव्यावर बसविण्यात आलेले पाईप फुटले असल्याने पावसाळ्यात किंवा कालवा सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी आमगावचे अभियंता यांच्याकडे केली होती. परंतु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच एकरातील रोवणी सडली आहे. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने रोवणी करण्यासाठी म्हणून बाघ पाटबंधारे विभागाचा पुजारीटोला धरणातून जाणाऱ्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. मागील आठ दिवसांपासून कालवा सुरू असल्यामुळे रामाटोला येथील या पाईपला मोठे भगदाळ पडले आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. राजू श्रीराम चौधरी, अशोक श्रीराम चौधरी, वसंत चौधरी, सोमा परतेती व मदन शिवपूरी या पाच शेतकऱ्यांची पाच ते सहा एकर रोवणी सडली. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला कळवूनही त्यांनी लक्ष दिले नाही. ते पाईप दुरूस्त करून नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी जि.प.सदस्य रमेश उर्फ छोटू बहेकार यांनी दिला आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेती