शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यव्यवसाय आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:14 IST

यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देतलावात पाणी नसल्याने संकट : ९० टक्के तलावांमध्ये पाणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर ९० टक्के तलावांमध्ये पाणीच नसल्याने जिल्ह्यातील मत्यपालन व्यवसाय आॅक्सिजनवर असल्याचे बिकट चित्र आहे.तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जवळपास जिल्ह्यातील प्रत्येक गावात तलाव आहे. या तलावांचा उपयोग शेतीसाठी सिंचन आणि मत्सपालनासाठी केला जातो. यावर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धानपिके धोक्यात आली असून एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला बसला आहे.मत्स्य व्यवसाय विकास विभागाने नुकतेच जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांचे सर्वेक्षण केले. त्यात ९० टक्के तलावांमध्ये पाणीसाठा नसल्याचे आढळले. या विभागातर्फे तालुकानिहाय माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असून पावसाअभावी किती मत्स्यपालन संस्था व मत्स्य व्यावसायीकांचे नुकसान झाले. याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा योग्य आकडा मिळण्याची शक्यता आहे.कमी पावसाअभावी बरेच तलाव अद्यापही भरलेले नाहीत. सध्या ज्या तलावांमध्ये थोड्या फार प्रमाणात पाणी आहे ते देखील जानेवारीपर्यंत संपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे तलाव मत्स्यपालनासाठी उपयोगात येणार नाही. तलावात पाणीच नसेल तर मत्स्यबीज सोडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मत्स्य बीज केंद्रावर मत्स्यबीज उपलब्ध करुन दिले जातात. मात्र पाऊस न झाल्यास मत्स्यबीज उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे मत्स्य विकास विभागाचे एस.पी.वाटेगांवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पावसाअभावी मत्स्यपालन व्यवसाय संकटात आल्याने त्यावर आधारित शेकडो कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांची माहिती घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.गेल्या २५ वर्षांत प्रथमच कमी पावसाची नोंदजून ते १० सप्टेंबर या कालावधील जिल्ह्यात ७१२ मिमी.पावसाची नोंद झाली. ते सरासरीच्या केवळ ५४ टक्के आहे. पावसाळा जवळपास संपत आला असून गेल्या २५ वर्षांत प्रथमच ऐवढ्या कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे.३९ तलावांची निविदा प्रक्रिया सुरूमत्स्य विकास विभागाचे जिल्ह्यात ६६ तलाव आहेत. यापैकी ३९ तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाते. हे तलाव निविदा काढून मत्स्यपालनासाठी दिले जातात. यंदा पाऊस कमी झाल्याने तलावांच्या निविदा प्रक्रियेवर देखील परिणाम झाला आहे. ३९ तलावांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.१० हजार मेट्रीक टन उत्पादन२०१६-१७ या वर्षांत जिल्ह्याला ११ हजार ११० मेट्रीक टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातुुलनेत यापैकी १० हजार ९४५ मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले. जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांच्या माध्यमातून ४० लाख ५० हजार मत्स्यबीज उत्पादनाचे उद्दिष्ट होते. यापैकी प्रत्येक्षात ४१ लाख ४२ हजार मत्स्यबीज उत्पादन झाले होते. मात्र यावर्षी यात मोठी घट होण्याची शक्यता आहे.