शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

मत्स्यव्यवसाय आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:14 IST

यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देतलावात पाणी नसल्याने संकट : ९० टक्के तलावांमध्ये पाणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ सरासरीच्या ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या व मध्यम जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर ९० टक्के तलावांमध्ये पाणीच नसल्याने जिल्ह्यातील मत्यपालन व्यवसाय आॅक्सिजनवर असल्याचे बिकट चित्र आहे.तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जवळपास जिल्ह्यातील प्रत्येक गावात तलाव आहे. या तलावांचा उपयोग शेतीसाठी सिंचन आणि मत्सपालनासाठी केला जातो. यावर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धानपिके धोक्यात आली असून एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. कमी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला बसला आहे.मत्स्य व्यवसाय विकास विभागाने नुकतेच जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांचे सर्वेक्षण केले. त्यात ९० टक्के तलावांमध्ये पाणीसाठा नसल्याचे आढळले. या विभागातर्फे तालुकानिहाय माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असून पावसाअभावी किती मत्स्यपालन संस्था व मत्स्य व्यावसायीकांचे नुकसान झाले. याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा योग्य आकडा मिळण्याची शक्यता आहे.कमी पावसाअभावी बरेच तलाव अद्यापही भरलेले नाहीत. सध्या ज्या तलावांमध्ये थोड्या फार प्रमाणात पाणी आहे ते देखील जानेवारीपर्यंत संपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे तलाव मत्स्यपालनासाठी उपयोगात येणार नाही. तलावात पाणीच नसेल तर मत्स्यबीज सोडायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मत्स्य बीज केंद्रावर मत्स्यबीज उपलब्ध करुन दिले जातात. मात्र पाऊस न झाल्यास मत्स्यबीज उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे मत्स्य विकास विभागाचे एस.पी.वाटेगांवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पावसाअभावी मत्स्यपालन व्यवसाय संकटात आल्याने त्यावर आधारित शेकडो कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांची माहिती घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.गेल्या २५ वर्षांत प्रथमच कमी पावसाची नोंदजून ते १० सप्टेंबर या कालावधील जिल्ह्यात ७१२ मिमी.पावसाची नोंद झाली. ते सरासरीच्या केवळ ५४ टक्के आहे. पावसाळा जवळपास संपत आला असून गेल्या २५ वर्षांत प्रथमच ऐवढ्या कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे.३९ तलावांची निविदा प्रक्रिया सुरूमत्स्य विकास विभागाचे जिल्ह्यात ६६ तलाव आहेत. यापैकी ३९ तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाते. हे तलाव निविदा काढून मत्स्यपालनासाठी दिले जातात. यंदा पाऊस कमी झाल्याने तलावांच्या निविदा प्रक्रियेवर देखील परिणाम झाला आहे. ३९ तलावांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.१० हजार मेट्रीक टन उत्पादन२०१६-१७ या वर्षांत जिल्ह्याला ११ हजार ११० मेट्रीक टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातुुलनेत यापैकी १० हजार ९४५ मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले. जिल्ह्यातील मत्स्यपालन तलावांच्या माध्यमातून ४० लाख ५० हजार मत्स्यबीज उत्पादनाचे उद्दिष्ट होते. यापैकी प्रत्येक्षात ४१ लाख ४२ हजार मत्स्यबीज उत्पादन झाले होते. मात्र यावर्षी यात मोठी घट होण्याची शक्यता आहे.