शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

यंदाही शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:31 IST

शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । केवळ एक कोटी मिळाले, ३.५२ कोटी कधी मिळणार ?

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशातच यायला हवे असे असतांना शाळा सुरू होण्यास दहा दिवसाचा कालावधी शिल्लक असून ३ कोटी ५१ लाख रूपये गणवेशासाठी मिळाला नाही. हा निधी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशात शाळेत जाता येणार नाही.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन जोडी गणवेश दिले जाते. त्या गणवेशासाठी ४०० रूपये दिले जायचे. गणवेशाच्या निधीत मागच्या वर्षीपासून २०० रूपयांनी वाढ करण्यात आली. गणवेशाची रक्कम डीबीटीमार्फत जमा करण्यात आल्यामुळे शून्य शिल्लकेवर खाते उघडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यातील गणवेशाची रक्कम बँकांनी कमीत कमी बॅलेंंन्स नसल्याचे कारण दर्शवून लाखो रूपये कपात केले. त्यामुळे डीबीटीच्या नादात हजारो विद्यार्थी गणवेशाविना राहीले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जातीचे मुले, अनुसूचित जमातीची मुले व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जाते. प्रती गणवेश खरेदीसाठी ३०० रुपये असे एकूण दोन गणवेशासाठी ६०० रुपये शाळा व्यवस्थापन समितीला आता दिले जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्यातील ७५ हजार २७६ विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४ कोटी ५१ लाख ६५ हजार ६०० रूपये लागणार आहेत. यापैकी गणवेशाचे १ कोटी रूपये गोंदियाच्या समग्र शिक्षा अभियानाकडे आहेत. उर्वरीत ३ कोटी ५१ लाखाची मागणी करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत गणवेशाची रक्कम महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडून अद्याप मिळालेली नाही. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.पहिल्या दिवशी गणवेश मिळणे आवश्यक असतांना निधी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गणवेशाविना जाणार नाही.गणवेशाचा हिशेब व्यवस्थापन समितीकडेचशासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप केले जाते. मात्र मागील वर्षीपासून शासनाने गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे अर्धे सत्र लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते.परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही ही बाब लक्षात आल्यावर आता गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात टाकली जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी