शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यात आगीचा धोका

By admin | Updated: March 11, 2015 01:25 IST

उन्हाळ्याचे दिवस आले म्हणजे जंगलाला आग लागणे नवीन बाब नाही. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान आता नवेगाव व्याघ्र प्रकल्प झाला आहे.

सडक-अर्जुनी : उन्हाळ्याचे दिवस आले म्हणजे जंगलाला आग लागणे नवीन बाब नाही. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान आता नवेगाव व्याघ्र प्रकल्प झाला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध अटी लादून राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात जाण्यास बंदी केली आहे. या वनांना आगीपासून वाचविण्यासाठी वन व वन्यजीव विभाग तत्पर आहे.नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील कवलेवाडा, कालीमाटी व झलकारगोंदी या गावांतील लोकांचा राष्ट्रीय वनात हस्तक्षेप राहू नये, यासाठी गेल्या दोन वर्षापूर्वी सौंदड गावाजवळील श्रीरामनगर या गावी पुनर्वसन करण्यात आले. त्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च केले. ‘जंगळ राहील तर वाघ राहील व वाघ राहतील तर पर्यटक येतील’ या समिकरणानुसार राष्ट्रीय वनात मनुष्यांचा हस्तक्षेप कमी करण्याचा शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हा १२ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. त्यात कोसंबी, कोकणा, कोसमघाट, खोबा, ऐलोडी, रामपुरी आदी गावांचा परिसर उद्यानालगत येतो. तर नवेगाव अभयारण्य खोली, बोंडे व डोगरगाव-डेपो या वनपरिक्षेत्रात येतो. नवेगाव अभयारण्य हा १२ हजार २७६ हेक्टर आर क्षेत्रात विस्तारित आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याला आग लागू नये यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी नेहमी तत्पर असल्याचे दिसून येत आहे.कोसबी, कोसमघाट, कोकणा, ऐलोडी, रामपुरी या गावांत वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनअधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. रामपुरी येथील जनजागरण मेळाव्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे वनपिरक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांनी वनाला आग कशी लागते व त्यावर नियंत्रण करण्यासाठी गाव परिसरातील नागरिकांनी व गठीत समित्यांनी सहकार्याची भावना ठेवून जंगलाला आग लागणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय वनाला लागणारी आग ९५ टक्के दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून लावली जाते. तर ५ टक्के आग ही फक्त बांबूच्या घर्षनामुळे लागत असल्याचे दिसून येते. जंगलाला वनवा लागल्याने जंगलातील मूल्यवान औषधी वनस्पती जळून नष्ट होतात. उन्हाळ्यात लागणारा वनवा हा फार भयावह असतो. धावत सुटल्यासारखा जोरात पेट घेतो. या वनव्यामुळे लहान जीवजंतू, प्राणी व पक्षांना जीव गमवावा लागतो. तर मोठे प्राणी हे जीव वाचविण्यााठी धावत सुटतात. यामुळे गाव परिसराकडे आलेल्या प्राण्यांनाही जीव गमवावा लागतो. काही प्राणी हे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत मरताना दिसतात. जंगलाला वनवा लागूच नये यासाठी प्रत्येक नागरिकांचे सहकार्याची भावना ठेवणे गरजेचे आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या गावातील लोक हे मोहफूल वेचण्यासाठी आग लावतात. त्या लोकांनी आग स्वत: विझविण्याची दक्षता घ्यावी. पण तसे होत नाही. बहुतेक लोक आग लावून मोकळे होतात. यामुळे जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)