शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जि.प.च्या शाळांनाही अग्नीशमन यंत्राचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:42 IST

गुजरात राज्यातील सुरत येथील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीमुळे २० विद्यार्थ्यांना नाहक बळी गेला. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले. त्यानंतर कोचिंग क्लासेसमधील सुरक्षाविषयक उपाय योजनांना घेवून प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.मात्र कोंचिग क्लासेस प्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रच नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देअग्नीश्मन यंत्राची माहितीच नाही : शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गुजरात राज्यातील सुरत येथील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीमुळे २० विद्यार्थ्यांना नाहक बळी गेला. त्यामुळे या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले. त्यानंतर कोचिंग क्लासेसमधील सुरक्षाविषयक उपाय योजनांना घेवून प्रश्न चिन्ह उपस्थित झाले.मात्र कोंचिग क्लासेस प्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रच नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.त्यामुळे १०३८ शाळांमधील हजारो विद्यार्थी धोका पत्थकारुन शिक्षण घेत असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०३८ शाळा असून यापैकी किती शाळांमध्ये अग्नीशमन यंत्र आहेत, याची माहिती जि.प.शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारली असता त्यांना याबाबत माहितीच नसल्याची बाब पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील १०३८ जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी जीव धोक्यात टाकून शिक्षण घेत आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३२, आमगाव ११०, देवरी १४१, गोंदिया १८८, गोरेगाव १०८, सालेकसा १०९, सडक-अर्जुनी ११२, तिरोडा १३८ अश्या १०३८ शाळांमध्ये अग्नीशमन यंत्र नसल्याचे गृहीत धरायचे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शाळांत ही यंत्रे आहेत त्या शाळांतील अग्नीशमन यंत्राची मुदत संपली आहे. त्याच्या नुतनीकरणासाठी एक ते दोन हजार रूपये खर्च येणार असते. त्यामुळे कोणत्याही शाळेत त्या अग्नीशमन यंत्राचे नुतनीकरण करीत नसल्याची माहिती आहे.त्यामुळे जि.प.शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सुरक्षेप्रती किती सजग आहे याची प्रचिती येते. जि.प.चे शिक्षणाधिकारी विविध उपक्रम राबवून राज्य स्तरावर गोंदिया जिल्हा शिक्षणात कसा सरस आहे प्रसिध्द पत्रक काढून सांगायला विसरत नाही. मात्र दुसरीकडे अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नसून त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.युडायसच्या माहितीतही अग्नीशमनचा प्रश्नच नाहीप्रगत शैक्षणीक महाराष्ट्राचा विचार करतांना शाळांची माहिती भरण्यासाठी शासनाने शाळांची भौतिक सुविधा, गुणवत्ता या सर्व बाबींचा विचार केला. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेला अग्नीशमन यंत्र शाळेत उपलब्ध आहेत किंवा नाही यासंदर्भात माहिती देणारा कॉलम त्यात न ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचा विचारच राज्य पातळीपासून होत नाही.धोका पत्करूनच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.

टॅग्स :Schoolशाळा