शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे टरबूज उत्पादकांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात.

ठळक मुद्देहंगाम गमाविण्याची वेळ : कोरोनाचाही परिणाम, लागवड खर्चही भरुन निघणे कठीण

राजेश मुनीश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने याचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. तर अवकाळी पावसामुळे टरबूज, डांगरू उत्पादक शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मालाची वाहतूक होत नसल्याने बºयाच प्रमाणात माल जागेवरच सडत असल्याने टरबूज उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार, चिचटोला, कोकणा, कोसमतोंडी, रेंगेपार, बकी, मेंडकी, मनेरी,पांढरी, मलिजुंगा, सौंदड, शेंडा परिसरातील शेतकरी रब्बी हंगामादरम्यान टरबूज आणि डांगराची लागवड करतात.या भागातील टरबूज देशात आणि देशाबाहेर सुध्दा पाठविले जातात. त्यामुळे तीन महिन्याचा कालावधी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.मात्र यंदा सातत्याने येणाऱ्या अवकाळी पावसामुळे टरबूज उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. गारपीट आणि पावसामुळे टरबूज खराब होत असल्याने त्यांची विक्री न करता ते तसेच फेकून देण्याची वेळ टरबूज उत्पादक शेतकºयांवर आली आली आहे.सिंदीपार येथील ओंकार लजे, जोशीराम लंजे, चंदू लंजे, सेवकराम लंजे, सुरेश गहाणे, केवळराम लजे, कैलाश लंजे, आदी शेतकºयांनी २२५ एकरात टरबूज पिकाची लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावीत असल्यामुळे टरबूज व डांगरू पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. फळ बरोबर आले नाही, काही प्रमाणात फळ आले तर फळांना मागणी नसल्याने हाती आलेले पीक शेतात तसेच पडून आहे.सध्या कोरोनाचा प्रकोप वाढल्याने, लॉकडाऊन असल्यामुळे कुणीही घरा बाहेर पडत नसल्याने टरबुजाची मागणी कमी झाली आहे. परिणामी या शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च निघणे सुध्दा कठीण आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार गावात २२५ एकर शेतीत टरबूज व डांगरू पिकाची लागवड केली आहे.सध्याची परिस्थिती पाहता लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. टरबूज उत्पादक शेतकºयांनी स्थिती पाहता त्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.गेल्या वर्षी माझ्या शेतात खर्च वजा करता निवळ नफा चार लाख रूपये मिळाला होता.पण यावर्षी नफा मिळणे कठीण असून केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे.- चंदू लंजे, शेतकरी सिंदीपारमी माझ्या सात एकरात डांगरू पिकाची लागवड केली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे डांगराच्या वेलावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने फळ बरोबर आले नाही.कोरोनामुळे डांगरांना मागणी नसल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी आहे.- ओंकार लंजे, शेतकरी

टॅग्स :Rainपाऊस