शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कर्जमाफीची दहावी यादी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:21 IST

मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे.

ठळक मुद्दे९ हजार ४०७ शेतकऱ्यांचा समावेश : २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त, बँका लागल्या कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा बँकाना प्राप्त झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८६ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. यापैकी ६० हजार शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र उर्वरित २६ हजारावर शेतकरी मागील वर्षभरापासून कर्जमाफीपासून वंचित होते.या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने खरीप हंगामात नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर काही शेतकऱ्यांना सावकारांकडून व्याजाने कर्ज घेवून कर्जाची उचल करावी लागली. वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये यावरुन संभ्रमाचे वातावरण होते. महाआॅनलाईनकडून बँकाना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी पाठविण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.लोकमतने जिल्ह्यातील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने लावून धरला. कर्जमाफीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती वाढता असंतोष पाहून शासनाने जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी बँका आणि जिल्हा निंबंधक कार्यालयाला पाठविली आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला असून येत्या दोन तीन दिवसात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम जमा करून त्याचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. त्यामुळे संकटातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.येलो यादीतील किती शेतकरी पात्र ठरणारपंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेला महाआॅनलाईनकडून १८ हजार ७२५ शेतकऱ्यांची येलो यादी पडताळणीसाठी प्राप्त झाली. सध्या या यादीची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणीनंतर या यादीतील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात याकडे लक्ष लागले. ही येलो यादी पडताळणी करुन तिचे ग्रीन यादीत रुपातंर करण्यासाठी पुन्हा महॉआॅनलाईनकडे पाठविली जाणार आहे.आता प्रतीक्षा शेवटच्या यादीचीजिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी आत्तापर्यंत बँकेला प्राप्त झाली आहे. आता अखेरची अकारावी यादी येणार असून त्यात किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात हे कळणार आहे. बँक अधिकाऱ्यांच्या मते ही शेवटची यादी असणार आहे. त्यामुळे या यादीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी