शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

...अखेर कर्जमाफीची दहावी यादी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:21 IST

मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे.

ठळक मुद्दे९ हजार ४०७ शेतकऱ्यांचा समावेश : २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त, बँका लागल्या कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार महिन्यापासून कर्जमाफीच्या दहाव्या ग्रीन यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची ग्रीन यादी गुरूवारी (दि.४) बँकेला प्राप्त झाली असून या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा बँकाना प्राप्त झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८६ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले होते. यापैकी ६० हजार शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र उर्वरित २६ हजारावर शेतकरी मागील वर्षभरापासून कर्जमाफीपासून वंचित होते.या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने खरीप हंगामात नवीन पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागले. तर काही शेतकऱ्यांना सावकारांकडून व्याजाने कर्ज घेवून कर्जाची उचल करावी लागली. वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये यावरुन संभ्रमाचे वातावरण होते. महाआॅनलाईनकडून बँकाना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी पाठविण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.लोकमतने जिल्ह्यातील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने लावून धरला. कर्जमाफीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती वाढता असंतोष पाहून शासनाने जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ९ हजार ४०७ शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी बँका आणि जिल्हा निंबंधक कार्यालयाला पाठविली आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला असून येत्या दोन तीन दिवसात कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम जमा करून त्याचे कर्ज खाते शून्य केले जाणार आहे. त्यामुळे संकटातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.येलो यादीतील किती शेतकरी पात्र ठरणारपंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेला महाआॅनलाईनकडून १८ हजार ७२५ शेतकऱ्यांची येलो यादी पडताळणीसाठी प्राप्त झाली. सध्या या यादीची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणीनंतर या यादीतील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात याकडे लक्ष लागले. ही येलो यादी पडताळणी करुन तिचे ग्रीन यादीत रुपातंर करण्यासाठी पुन्हा महॉआॅनलाईनकडे पाठविली जाणार आहे.आता प्रतीक्षा शेवटच्या यादीचीजिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी आत्तापर्यंत बँकेला प्राप्त झाली आहे. आता अखेरची अकारावी यादी येणार असून त्यात किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात हे कळणार आहे. बँक अधिकाऱ्यांच्या मते ही शेवटची यादी असणार आहे. त्यामुळे या यादीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी