शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद

By admin | Updated: April 6, 2015 01:45 IST

जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची देयके न काढल्यामुळे कंत्राटी पद्धतीवर मागील वर्षापासून सुरू असलेली रामपुरी

१० गावांतील पाणी पुरवठा खंडीत : नागरिकांचा आंदोलनाचा इशारा नवेगावबांध : जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची देयके न काढल्यामुळे कंत्राटी पद्धतीवर मागील वर्षापासून सुरू असलेली रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराने शनिवारपासून (दि.४) बंद केली. यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या १० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात उपस्थित झालेला आहे. यावरुन जिल्हा परिषद सामान्य माणसांच्या सोई-सुविधांबाबद किती जागरुक आहे हे लक्षात येते.कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार केली. परंतु सदर योजना चालवायची कुणी असा प्रश्न निर्माण झाला. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोको आंदोलन केले. त्या आंदोलनाचे यश म्हणून जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा योजना सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला होता. अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेली रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना याच आंदोलनानंतर सुरू झाली. यासाठी ई-निविदेच्या माध्यमातून कंत्राटही देण्यात आले. सुरुवातीला १६ लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. १ आॅगस्ट २०१४ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून रामपुरी, येरंडी/दर्रे, एनोडी (जांभडी), तिडका, धाबेपवनी, जब्बारखेडा, रोजीटोला, कोहलगाव, कान्होली व धाबेटेकडी या १० गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कंत्राटदारांनी योजना सुरू केल्यानंतर कार्याची देयके जिल्हा परिषदेकडे सादर केली असता वित्तविभागाने ती काढली नाहीत. आजघडीला सुमारे आठ लक्ष रुपये जिल्हा परिषदेकडे थकीत असल्याचे सांगण्यात येते. वास्तविकपणे ई-निविदेनंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्याने या निविदेची मुख्य लेखाधिकारी यांच्याकडून आर्थिक मंजुरी घेणे आवश्यक होते. परंतु तसे करण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटदारांची देयके अडविण्यात आल्याचे समजते. परंतु कार्यकारी अभियंत्यांच्या चुकीचे खापर कंत्राटदाराच्या डोक्यावर फोडण्याचे कारण मात्र समजत नाही. हा तर चोर सोडून सन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार दिसून येत आहे.लोकप्रतिनिधींच्या आंदोलनामुळे कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने योजना सुरू करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले असले तरी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन लेखाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोनातून ही योजना पूर्ववत सुरू ठेवणे गरजेचे होते. परंतु जि.प.तील अधिकाऱ्यांनी नियमांचा बडगा दाखवून आपला अहंकार संतुष्ट केला व यामध्ये १० गावांतील नागरिक मात्र भरडल्या जात आहेत. याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. जिल्हा परिषदेने सामान्य नागरिकांच्या सोईसुविधांचे काम करायचे की अधिकाऱ्यांच्या अहंकाराची संतुष्टी करायची हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. पाण्यासाठी या १० गावांतील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. (वार्ताहर) झाशीनगर योजना निर्मितीची गरज काय?राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४६ लाख रुपये खर्चाच्या झाशिनगर पाणीपुरवठा योजनेला जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मंजुरी दिली. यासाठी झाशीनगर येथे विहिर खोदकाम व पंप हाऊसची निर्मिती नव्याने करण्यात येणार आहे. वास्तविक रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन झाशीनगरपासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावरुन गेलेली आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून झाशीनगरला अत्यल्प खर्चात बारमाही पाणी मिळू शकते, असे असतानाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे नव्या योजनेला मंजुरी देणे ही अनाकलनिय बाब आहे, असा आरोपही होत आहे. बडोलेंनी लक्ष घालावेप्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठीच राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत आहे. ना. बडोलेंच्याच मागील वर्षीच्या आंदोलनाने अनेक पाणी पुरवठा योजना सुरू झालेल्या होत्या. मागील वर्षी तर विद्यमान पालकमंत्री विरोधी पक्षाचे आमदार होते. सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी जि.प.मधील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेला आळा घालून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.