शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

अखेर धान खरेदीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर  दिल्याने केंद्राने राज्य शासनाला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्यानंतर भंडारा-गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात १०७१२८ हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला २७६०००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मागील १५ दिवसांपासून धान खरेदी बंद असल्याने चिंताग्रस्त असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या रब्बी धान खरेदीचे उद्दिष्ट पुन्हा एकदा वाढवून दिले असून या संदर्भातील आदेश २ जुलै रोजी काढण्यात आले आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असून उद्यापासून पुन्हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी सुरू होणार आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्राला पेरणी संदर्भातील चुकीची आकडेवारी दिली होती. सुरुवातीला राज्य शासनाने संपूर्ण राज्याचे पेरणी क्षेत्र ५६०८ हेक्टर पाठविले होते. त्यापैकी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पेरणीचे क्षेत्र ४०३२५ हेक्टर  दिल्याने केंद्राने राज्य शासनाला १५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट दिले. ते पूर्ण झाल्यानंतर भंडारा-गोंदियाच्या कृषी विभागाने मे महिन्यात १०७१२८ हेक्टर लागवडीचा अहवाल पाठवला. या आधारे राज्याला २७६०००० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले. दोन्ही वेळा राज्य शासनाने केंद्राला चुकीचा अहवाल दिल्याने धान खरेदीचे उद्दिष्ट कमी मिळाले. त्यामुळे धान खरेदी बंद झाली. यामुळे धान विकल्या न गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली तगमग पाहून खासदार मेंढे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येत अखेर शनिवारी (दि.२) केंद्र शासनाने पत्र काढीत राज्याचे धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिल्याचे स्पष्ट केले. २७ लाख क्विंटलवरून आता हे उद्दिष्ट ४६ लाख क्विंटल करण्यात आले आहे. त्यामुळे आता बंद पडलेली धान खरेदी उद्यापासून सुरू होणार आहे.

मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांची होणार सोय - केंद्र शासनाने जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून देत धान खरेदीला मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांची ऐन हंगामात सोय होणार आहे. जुन्या आदेशानुसार उद्दीष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील धान खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे हजारो क्विटंल धान अद्याप पडून असल्याचे त्यांची अडचण झाली होती. धान विकला न गेल्याने त्यांच्या हाती पैसा नव्हता व त्यात खरिपात काय करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र केंद्र शासनाने संपूर्ण परिस्थिती जाणून घेत जिल्हयातील धान खरेदीचे उद्दीष्ट वाढवून दिले. शिवाय धान खरेदीला मुदतवाढ दिल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील धान विकून हाती पैसा येणार. अशात त्यांना खरिपात येत असलेली अडचण सुटणार व खरिपातही चांगले उत्पादन घेता येणार आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड