शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर राज्य शासनाने काढलेले परिपत्रक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १९ मे रोजी पत्राद्वारे पणन हंगाम २०२०-२१ (रब्बी) धान खरेदीबाबत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे ...

गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १९ मे रोजी पत्राद्वारे पणन हंगाम २०२०-२१ (रब्बी) धान खरेदीबाबत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे शासनावर बंधनकारक नाही, असे आदेश काढून शेतकऱ्यांमध्ये फार मोठा संभ्रम निर्माण केला होता. आ. डॉ. परिणय फुके याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर अखेर राज्य शासनाने हे परिपत्रक रद्द केले आहे.

राज्य शासनाच्या १९ मे रोजीच्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंध‌ळ उडाला होता. धान उत्पादन असलेल्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे ही अ‍ट रद्द करावी, अशी मागणीसुध्दा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली होती. परंतु शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला या सरकारकडे वेळ नव्हता. हा तुघलकी आदेश रद्द करावा याकरिता आमदार डॉ. फुके यांनी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनसुध्दा दिले होते. एवढेच नव्हे तर, १९ मे चे परिपत्रक तत्काळ रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निवेदन वजा इशाराच भेटी दरम्यान दिला होता. यावर अखेर राज्य शासनाने २ जून रोजी परिपत्रक काढून १९ मे रोजी काढलेल्या परिपत्रकातील त्या उल्लेखामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यासाठी धान घेणे बंधनकारक नाहीची अट रद्द करण्याबाबतचा केलेला उल्लेख मागे घेतला. यामुळे आता शेतकऱ्यांच्या पूर्ण धानाची उचल सरकार करणार आहे.