शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाईपलाईनच्या खोदकामासाठी शेतातील पिके केली भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 21:38 IST

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे पाणी बोदलकसा तलावामध्ये टाकण्यासाठी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम अपूर्ण असून, फक्त सुकडी डाकराम ते पिंडकेपार सोनझारीटोली दीड कि.मी.चे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शेतातून पाईप लाईन न टाकता रस्त्याने पाईप टाकण्याची मागणी केली होती. तसेच याला विरोध केला होता. पण संबंधित विभागाने पोलीस बंदोबस्तात शेतामधून पाईप लाईन टाकली. परिणामी शेतामध्ये मोवरीच्या उभ्या पिकातून खोदकाम सुरु केले. परिणामी मोवरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. 

हितेंद्र जांभुळकरलोकमत न्यूज नेटवर्क सुकडी/डाकराम :  धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ च्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुकडी डाकराम येथील शेतकऱ्यांच्या शेतातून केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. पण, याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे पाणी बोदलकसा तलावामध्ये टाकण्यासाठी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम अपूर्ण असून, फक्त सुकडी डाकराम ते पिंडकेपार सोनझारीटोली दीड कि.मी.चे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शेतातून पाईप लाईन न टाकता रस्त्याने पाईप टाकण्याची मागणी केली होती. तसेच याला विरोध केला होता. पण संबंधित विभागाने पोलीस बंदोबस्तात शेतामधून पाईप लाईन टाकली. परिणामी शेतामध्ये मोवरीच्या उभ्या पिकातून खोदकाम सुरु केले. परिणामी मोवरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. धापेवाडा उपसा सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्या उभ्या पिकांचीसुद्धा त्यांना गय केली नाही. आधीच नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या भूमिकेमुळे कृत्रिम संकटांना तोंड द्यावे लागत आहे. धापेवाडा उपसा सिंचन विभाग तिरोडाचे कार्यकारी अभियंता ए. पी. कापसे यांच्याशी संपर्क उभ्या मोवरी पिकातून खोदकाम केले.   त्या पिकांचे नुकसानभरपाई किती देणार यावर कापसे यांनी ही माहिती तुम्हाला माहिती देण्याची गरज नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.

नुकसानभरपाई मिळणार की नाही?- गट क्र. ३६६, १.६२ हे.आर. मध्ये मोवरी पिकाची लागवड केली होती. त्यामध्ये चार एकरांपैकी ३ एकर शेतातील मोवरी पीक पूर्णपणे नष्ट केले. पीक नष्ट झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना नुकसानभरपाईसुद्धा मिळणार नाही. संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा योग्य उत्तर देत नसल्याने नुकसानभरपाई मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

माझी चार एकर शेती असून, मोवरी पिकापैकी तीन एकर मोवरी पीक पूर्णपणे भुईसपाट झाले. त्यांचे नुकसानभरपाईसाठी अधिकारी, कर्मचारी कोणीच सांगायला व बोलायला तयार नाही. आम्हा शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही.  - ईश्वर लांजेवार, सुकडी डाकराम

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती