शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

खताच्या किमती आकाशाला; पण शेतमालाचे भाव जमिनीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : यंदा खताच्या किमतीमध्ये चारपट वाढ झाल्याने खरीप हंगामाच्या लागवड खर्चात वाढ झाली असून, शेती करायची ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : यंदा खताच्या किमतीमध्ये चारपट वाढ झाल्याने खरीप हंगामाच्या लागवड खर्चात वाढ झाली असून, शेती करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे मागील वर्षीपासून शेतकरी आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यातच आता खताच्या किमती आकाशाला भिडल्या असून, शेतमालाच्या किमती मात्र स्थिर असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

सर्वच खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये यंदा भरमसाट वाढ केली आहे. मागील वर्षी ११८५ रुपयांना मिळणाऱ्या डीएपी खताच्या एका बॅगसाठी यंदा शेतकऱ्यांना १९०० रुपये मोजावे लागत आहेत, तर हीच स्थिती अन्य खतांची आहे. खत कंपन्यांनी कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत खताच्या किमतीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे यंदा खरीप हंगामाचे बजेट पूर्णपणे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक एकर धानाच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना पूर्वी १५ ते १८ हजार रुपये खर्च येत होता. मात्र, यंदा खताच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने २५ हजार रुपयांपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे. एकरी १७ ते १८ क्विंटल धानाचे उत्पादन होत असून, लागवड खर्च जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक न राहण्याची शक्यता आहे. खते, बियाणे आणि इतर खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणे ताेट्याचे होत चालले आहे.

.....

खताचे जुने आणि नवीन दर

खताचे नाव जुने दर नवीन दर वाढ

१०.२६.२६ ११७५ १७७५ ६००

१२.३२.२६ ११९० १८०० ६१०

२०.२०.० ९७५ १३५० ३७५

डीएपी ११८५ १९०० ७१५

..................................................................................

कोट :

कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसल्याने मागील वर्षीपासून शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांवरील बोजा वाढविणे कितपत योग्य आहे याचा विचार केंद्र सरकारनेच करायला हवा. खताची वाढविलेल्या किमती केंद्राने कमी करण्याची गरज आहे.

- प्रफुल्ल पटेल, खासदार.

.......

केंद्र सरकारने शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्नसुद्धा दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, पण या दोन्ही आश्वासने पोकळ ठरली आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना बी-बियाणे खतावर अनुदान देण्याची गरज असताना केंद्र सरकार खताच्या किमती वाढवित आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत केंद्राचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण अशीच स्थिती आहे.

- विजय जावंधिया, शेतकरी अभ्यासक.

...............

पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खते आणि बियाणांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. यामुळे धानाच्या लागवड खर्चात वाढ झाली आहे. खर्च आणि उत्पन्नाचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्या धोरणामुळे आली आहे.

- निहारीलाल दमाहे, शेतकरी.