शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. मागील ६-७ दिवसांतील ही आकडेवारी असून अचानकच झालेल्या या स्फोटामुळे जिल्हावासी हादरून गेले आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांकडून लपविली जाते माहिती : कित्येक जण घरात असल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या प्रादुभार्वात राज्य आघाडीवर असून दिवसागणिक रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशात परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांनी स्वत:ची तपासणी करवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे गरजेचे झाले आहे. मात्र क्वारंटाईनच्या भीतीमुळे बाहेरून आलेले व्यक्ती घरातच दबा धरून आहेत. शहरात आजही कित्येक जण घरात असून कुटुंबीयांकडून त्यांची माहिती लपविली जात असल्याचे तसेच ऐकू येत आहे. यामुळे मात्र शहरात धोका वाढला असून शहरवासी दहशतीत वावरत आहेत.शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. मागील ६-७ दिवसांतील ही आकडेवारी असून अचानकच झालेल्या या स्फोटामुळे जिल्हावासी हादरून गेले आहे.विशेष म्हणजे, परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असून ते पूर्ण जिल्ह्यातच पसरत आहेत. यामुळेच आजघडीला देवरी तालुका सोडून उर्वरीत सातही तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.हा प्रकार बघता बाहेरून येणाºयां व्यक्तींनी सर्वप्रथम आरोग्य विभागाकडून तपासणी व त्यांचा सल्ला ऐकूनच संस्था किंवा घरातच क्वारंटाईन करायचे काय हे ठरविणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून त्यांच्यापासून त्यांना स्वत:ला शिवाय कुटुंबीय व समाजाला धोका निर्माण होणार नाही.मात्र असे होत नसून बाहेरून येणारे क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा धरून आहेत. शिवाय कुटुंबीयही त्यांची माहिती लपवत असल्याने शहरासाठी धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, आजही शहरात मोठ्या संख्येत बाहेरून आलेले व्यक्ती घरातच असल्याची माहिती आहे.शिक्षितांकडून अशिक्षितपणाची वागणूकग्रामीण भागात येत असलेले मजूर आपल्या घरात राहत असून कुणाचेही ऐकत नसल्याचे ऐकीवात आहे. त्यांचे शिक्षण व परिस्थिती बघता त्यांच्याकडून हे अपेक्षीत आहे. मात्र शहरात बाहेरून येणारे विद्यार्थी व कुटुंबीय घरात बसून असल्याने अशा शिक्षितांकडून हा प्रकार अपेक्षीत नाही. मात्र खेदाची बाब आहे की हे शहरात घडत आहे.आशा सेविकांची फरफटभर उन्हात जेथे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे तेथे आशा सेविका आपल्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन माहिती संकलीत करीत आहेत. असे असताना मात्र एरवी प्रभागात मिरविणारे नगरसेवक आता दिसत नसल्याचे ऐकीवात आहे. विशेष आपापल्या प्रभागातील घरा-घरांची माहिती त्यांच्याकडे असते. अशात त्यांनी आता पुढे येऊन बाहेरून आलेल्यांची तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील पाऊल उचलण्याची आजची गरज असून यातूनच शहराला सुरक्षीत ठेवता येईल.पोलीस कर्मचारी द्यावे सोबतीलाशहरात प्रत्येकच भागात बाहेरून आलेल्यांनी घरात दबा धरल्याचे बोलले जात आहे. याबाबत शेजाºयांनाही माहिती असते. मात्र माहिती दिल्यास आपसातील संबंध खराब होतील यामुळे कुणीही काही बोलायला तयार नाही. शिवाय कुणी काही सांगायला गेल्यास वादविवाद व मारहाण होत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. अशात पोलिसांनी पुढाकार घेऊन अशांना उचलावे असेही शहरवासी बोलत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या