शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. मागील ६-७ दिवसांतील ही आकडेवारी असून अचानकच झालेल्या या स्फोटामुळे जिल्हावासी हादरून गेले आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांकडून लपविली जाते माहिती : कित्येक जण घरात असल्याने वाढला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या प्रादुभार्वात राज्य आघाडीवर असून दिवसागणिक रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशात परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांनी स्वत:ची तपासणी करवून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे गरजेचे झाले आहे. मात्र क्वारंटाईनच्या भीतीमुळे बाहेरून आलेले व्यक्ती घरातच दबा धरून आहेत. शहरात आजही कित्येक जण घरात असून कुटुंबीयांकडून त्यांची माहिती लपविली जात असल्याचे तसेच ऐकू येत आहे. यामुळे मात्र शहरात धोका वाढला असून शहरवासी दहशतीत वावरत आहेत.शहरात एक रूग्ण निघाला होता व तो बरा झाल्यानंतर सुमारे ४० दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र परराज्य व जिल्ह्यातील मजुर व अन्य व्यक्तींचे आगमन सुरू झाले व त्यामुळे जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडाला आहे. आज जिल्ह्याची आकडेवारी ५३ वर जाऊन पोहचली आहे. मागील ६-७ दिवसांतील ही आकडेवारी असून अचानकच झालेल्या या स्फोटामुळे जिल्हावासी हादरून गेले आहे.विशेष म्हणजे, परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असून ते पूर्ण जिल्ह्यातच पसरत आहेत. यामुळेच आजघडीला देवरी तालुका सोडून उर्वरीत सातही तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.हा प्रकार बघता बाहेरून येणाºयां व्यक्तींनी सर्वप्रथम आरोग्य विभागाकडून तपासणी व त्यांचा सल्ला ऐकूनच संस्था किंवा घरातच क्वारंटाईन करायचे काय हे ठरविणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून त्यांच्यापासून त्यांना स्वत:ला शिवाय कुटुंबीय व समाजाला धोका निर्माण होणार नाही.मात्र असे होत नसून बाहेरून येणारे क्वारंटाईनच्या भीतीने घरातच दबा धरून आहेत. शिवाय कुटुंबीयही त्यांची माहिती लपवत असल्याने शहरासाठी धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, आजही शहरात मोठ्या संख्येत बाहेरून आलेले व्यक्ती घरातच असल्याची माहिती आहे.शिक्षितांकडून अशिक्षितपणाची वागणूकग्रामीण भागात येत असलेले मजूर आपल्या घरात राहत असून कुणाचेही ऐकत नसल्याचे ऐकीवात आहे. त्यांचे शिक्षण व परिस्थिती बघता त्यांच्याकडून हे अपेक्षीत आहे. मात्र शहरात बाहेरून येणारे विद्यार्थी व कुटुंबीय घरात बसून असल्याने अशा शिक्षितांकडून हा प्रकार अपेक्षीत नाही. मात्र खेदाची बाब आहे की हे शहरात घडत आहे.आशा सेविकांची फरफटभर उन्हात जेथे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे तेथे आशा सेविका आपल्या जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन माहिती संकलीत करीत आहेत. असे असताना मात्र एरवी प्रभागात मिरविणारे नगरसेवक आता दिसत नसल्याचे ऐकीवात आहे. विशेष आपापल्या प्रभागातील घरा-घरांची माहिती त्यांच्याकडे असते. अशात त्यांनी आता पुढे येऊन बाहेरून आलेल्यांची तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील पाऊल उचलण्याची आजची गरज असून यातूनच शहराला सुरक्षीत ठेवता येईल.पोलीस कर्मचारी द्यावे सोबतीलाशहरात प्रत्येकच भागात बाहेरून आलेल्यांनी घरात दबा धरल्याचे बोलले जात आहे. याबाबत शेजाºयांनाही माहिती असते. मात्र माहिती दिल्यास आपसातील संबंध खराब होतील यामुळे कुणीही काही बोलायला तयार नाही. शिवाय कुणी काही सांगायला गेल्यास वादविवाद व मारहाण होत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. अशात पोलिसांनी पुढाकार घेऊन अशांना उचलावे असेही शहरवासी बोलत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या