शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

धानाच्या दराने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2015 00:07 IST

लग्नसराईची लगबग तथा अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

गोंदिया : लग्नसराईची लगबग तथा अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यात पुन्हा धानाचे भाव गडगडल्याने शेतकरी तथा व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. पूर्व विदर्भात धानाचे प्रमुख पीक घेतले जात आहे. गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शेतकरी धान पिकांच्या उत्पादनावरच वर्षभराचे नियोजन तयार करीत असतात. खरीप हंगामात उत्पादीत धानाची साठवणूक शेतकरी करीत असून मार्च अखेरीस कर्जाची परतफेड करण्यासाठी या धानाची विक्री करीत आहेत. बँका आणि सहकारी संस्थांचे क्रॉप लोन आदीचे देणे असल्याने शेतकरी या राशीची जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रबी हंगामातील उत्पादनाचे होत्याचे नव्हते झाले आहे. याच परिसरात धान उत्पादक शेतकरी सैरभैर झाला आहे. धानाचे भाव सध्या गडगडले आहे. कर्जाची परतफेड करायची असल्याने भाव नसतानाही शेतकऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. याच आर्थिक मंदीचा फटका व्यवसायीकांना बसला आहे. बाजारात खरेदी विक्रीवर मोठे संकट ओढवल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यवसायीकांचे डोक्यावर हात आहेत. हे अच्छे दिन की बुरे दिन हे कळेनासे झाले आहे. धानाच्या भाव वाढीवरुन पेंढी जाळण्याचा अनुभव शेतकरी आणि नागरिकांना आहे. पंरतु लोकप्रतिनिधी शांत झाले असल्याने विरोधक जाब विचारत आहेत. ग्रामीण भागात विशेषत: अर्जुनी परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधीचा रक्तदाब वाढत आहे. लग्नसराई तथा अन्य कार्यक्रमात लोकप्रतिनिधी हजेरी लावत आहेत. त्यांना धानाचे भाव गडगल्याचा एकच प्रश्न शेतकरी विचारत आहेत. केंद्र आणि राज्यात खासदार, आमदार एकाच पक्षाचे आहेत. धान उत्पादनावर जिल्हयातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सावरणारी आहे. त्यांचे वर्षभराचे आयुष्य याचे जनित याच उत्पादनावर धावत आहे. या मुद्दावर विरोधक बोलत असेल तरी उन्हाचे चटके बसून रस्त्यावर येण्याची सुरवात ते करीत नाहीत यामुळे शासन जागृत होत नसून शेतकऱ्यांत संताप आहे. मामा तलाव तथा शासकीय तलावाची अवस्था निधीअभावी वाईट झाली आहे. परिसरात सिंचनाचा चुराडा होत असताना लोकप्रतिनिधी, विरोधक आणि शेतकरी शांत असल्याने येणारे भवितव्य धोक्याची घंटी वाजविणारी आहे. (वार्ताहर)