शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

धानाच्या दराने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2015 00:07 IST

लग्नसराईची लगबग तथा अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

गोंदिया : लग्नसराईची लगबग तथा अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यात पुन्हा धानाचे भाव गडगडल्याने शेतकरी तथा व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. पूर्व विदर्भात धानाचे प्रमुख पीक घेतले जात आहे. गोंदिया, भंडारा जिल्ह्यात शेतकरी धान पिकांच्या उत्पादनावरच वर्षभराचे नियोजन तयार करीत असतात. खरीप हंगामात उत्पादीत धानाची साठवणूक शेतकरी करीत असून मार्च अखेरीस कर्जाची परतफेड करण्यासाठी या धानाची विक्री करीत आहेत. बँका आणि सहकारी संस्थांचे क्रॉप लोन आदीचे देणे असल्याने शेतकरी या राशीची जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रबी हंगामातील उत्पादनाचे होत्याचे नव्हते झाले आहे. याच परिसरात धान उत्पादक शेतकरी सैरभैर झाला आहे. धानाचे भाव सध्या गडगडले आहे. कर्जाची परतफेड करायची असल्याने भाव नसतानाही शेतकऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. याच आर्थिक मंदीचा फटका व्यवसायीकांना बसला आहे. बाजारात खरेदी विक्रीवर मोठे संकट ओढवल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यवसायीकांचे डोक्यावर हात आहेत. हे अच्छे दिन की बुरे दिन हे कळेनासे झाले आहे. धानाच्या भाव वाढीवरुन पेंढी जाळण्याचा अनुभव शेतकरी आणि नागरिकांना आहे. पंरतु लोकप्रतिनिधी शांत झाले असल्याने विरोधक जाब विचारत आहेत. ग्रामीण भागात विशेषत: अर्जुनी परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधीचा रक्तदाब वाढत आहे. लग्नसराई तथा अन्य कार्यक्रमात लोकप्रतिनिधी हजेरी लावत आहेत. त्यांना धानाचे भाव गडगल्याचा एकच प्रश्न शेतकरी विचारत आहेत. केंद्र आणि राज्यात खासदार, आमदार एकाच पक्षाचे आहेत. धान उत्पादनावर जिल्हयातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सावरणारी आहे. त्यांचे वर्षभराचे आयुष्य याचे जनित याच उत्पादनावर धावत आहे. या मुद्दावर विरोधक बोलत असेल तरी उन्हाचे चटके बसून रस्त्यावर येण्याची सुरवात ते करीत नाहीत यामुळे शासन जागृत होत नसून शेतकऱ्यांत संताप आहे. मामा तलाव तथा शासकीय तलावाची अवस्था निधीअभावी वाईट झाली आहे. परिसरात सिंचनाचा चुराडा होत असताना लोकप्रतिनिधी, विरोधक आणि शेतकरी शांत असल्याने येणारे भवितव्य धोक्याची घंटी वाजविणारी आहे. (वार्ताहर)