शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

धानपिकाच्या खरेदी-विक्रीत शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त

By admin | Updated: November 16, 2014 22:53 IST

जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन्

परसवाडा : जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त अशी स्थिती आहे. आता शासन व्यापाऱ्यांबद्दल कोणते पाऊल उचलते का? असा सवाल शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विचारला आहे.भारत कृषिप्रधान देश आहे. येथील जनतेचे जीवन कृषीवरच अवलंबून आहे. पण शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला कोणीच तयार नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान, पाणी व इतर बाबींवर अवलंबून पीक घेतले जाते. अधिकतर खाद्योपयोगी वस्तू, पीक भारतात तयार होते. पण काही पिकांना प्रोसेसिंग करून तयार केले जाते. त्यांना थोडीफार कशीतरी किंमत मिळते. पण शेतकऱ्यांना डच्चूच दिल्या जातो. जे शेतकरी आपल्या मुलाबाळांसह रात्रंदिवस राबराब राबतात, त्यांच्या पिकांना कधीही भाव मिळत नाही, ही येथील शोकांतिका आहे.डब्बेटोला येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. रामलाल दुर्गा पारधी यांचे पुत्र सूरजलाल रामलाल पारधी (६५) यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, आम्ही स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे फायदे घेतलेच नाही. आणि आता शेतात मरमर करूनही फायदा मिळत नाही. आठ एकर शेती असूनही कधी पिकांना भाव नाही तर कधी कर्जबाजारी व्हावे लागते. कधी पाणी नाही तर कधी पिकांना कीड लागते. खत, औषधी व मजुरांचे दर गगणाला भिडले. अशात जिल्ह्यातील धान पिकाला भाव किती मिळतो? कधी हजार तर कधी नऊशे! हमी भाव तर गायबच झाले. तसेच हमी भावासाठी डंका पिटणारे शेतकरी पुत्रही गायबच झाले. ४० वर्षांपूर्वी २० रूपये क्विंटल धानाला भाव होता. मजुरांना एक कुडो धान देत असत. तरीही परवडत असे. मजुरी कमी, रासायनिक खतांचा वापर कमी, दरसुद्धा कमी. सर्व कमीच असायचे. पण आजघडीला उत्पादन जास्त असूनही परवडत नाही. खत, पाणी, वीज, औषधीचे दर व इतर सोयींचा हिशेब केला तर शेतकऱ्यांच्या हाती शून्य हिशेब येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, कसे येतील त्यांचे चांगले दिवस, असे प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे आहेत. मात्र चांगले दिवस तर आले, पण ते व्यापारी वर्गाचे. हमी भावही गेले, खरेदी केंद्रही गेले, सर्वकाही गेले आणि नेते गप्पच बसून राहिले. शेतात बोअर करून पाणी काढले. कर्जही काढले आणि आता परतफेडीचा प्रश्न समोर आहे. पीकही आले, पण खर्च केलेले पैसे व पिकांचे पैसे बरोबर झाले. मेहनतही गेली आणि कर्जबाजारी झाले. आता ते पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचा वालीसुद्धा कुणी नाही. अशा शब्दात वयोवृद्ध शेतकरी सूरज पारधी यांनी आपल्यासह इतर शेतकऱ्यांची व्यथा कथन केली. (वार्ताहर)