शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाच्या खरेदी-विक्रीत शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त

By admin | Updated: November 16, 2014 22:53 IST

जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन्

परसवाडा : जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त अशी स्थिती आहे. आता शासन व्यापाऱ्यांबद्दल कोणते पाऊल उचलते का? असा सवाल शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विचारला आहे.भारत कृषिप्रधान देश आहे. येथील जनतेचे जीवन कृषीवरच अवलंबून आहे. पण शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला कोणीच तयार नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान, पाणी व इतर बाबींवर अवलंबून पीक घेतले जाते. अधिकतर खाद्योपयोगी वस्तू, पीक भारतात तयार होते. पण काही पिकांना प्रोसेसिंग करून तयार केले जाते. त्यांना थोडीफार कशीतरी किंमत मिळते. पण शेतकऱ्यांना डच्चूच दिल्या जातो. जे शेतकरी आपल्या मुलाबाळांसह रात्रंदिवस राबराब राबतात, त्यांच्या पिकांना कधीही भाव मिळत नाही, ही येथील शोकांतिका आहे.डब्बेटोला येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. रामलाल दुर्गा पारधी यांचे पुत्र सूरजलाल रामलाल पारधी (६५) यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, आम्ही स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे फायदे घेतलेच नाही. आणि आता शेतात मरमर करूनही फायदा मिळत नाही. आठ एकर शेती असूनही कधी पिकांना भाव नाही तर कधी कर्जबाजारी व्हावे लागते. कधी पाणी नाही तर कधी पिकांना कीड लागते. खत, औषधी व मजुरांचे दर गगणाला भिडले. अशात जिल्ह्यातील धान पिकाला भाव किती मिळतो? कधी हजार तर कधी नऊशे! हमी भाव तर गायबच झाले. तसेच हमी भावासाठी डंका पिटणारे शेतकरी पुत्रही गायबच झाले. ४० वर्षांपूर्वी २० रूपये क्विंटल धानाला भाव होता. मजुरांना एक कुडो धान देत असत. तरीही परवडत असे. मजुरी कमी, रासायनिक खतांचा वापर कमी, दरसुद्धा कमी. सर्व कमीच असायचे. पण आजघडीला उत्पादन जास्त असूनही परवडत नाही. खत, पाणी, वीज, औषधीचे दर व इतर सोयींचा हिशेब केला तर शेतकऱ्यांच्या हाती शून्य हिशेब येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, कसे येतील त्यांचे चांगले दिवस, असे प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे आहेत. मात्र चांगले दिवस तर आले, पण ते व्यापारी वर्गाचे. हमी भावही गेले, खरेदी केंद्रही गेले, सर्वकाही गेले आणि नेते गप्पच बसून राहिले. शेतात बोअर करून पाणी काढले. कर्जही काढले आणि आता परतफेडीचा प्रश्न समोर आहे. पीकही आले, पण खर्च केलेले पैसे व पिकांचे पैसे बरोबर झाले. मेहनतही गेली आणि कर्जबाजारी झाले. आता ते पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचा वालीसुद्धा कुणी नाही. अशा शब्दात वयोवृद्ध शेतकरी सूरज पारधी यांनी आपल्यासह इतर शेतकऱ्यांची व्यथा कथन केली. (वार्ताहर)