लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पावसाअभावी हजारो शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून रोवणी करण्यासाठी एकदा तरी जोराने बरस देवा म्हणून बळीराजा वरुण राजाकडे साकडे घालत असल्याचे चित्र आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवीत होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते. त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी परत येतो. पुन्हा पाऊस आला तर उद्याला रोवणी कुठून सुरु करायची याचे नियोजन करण्याचे स्वप्न बघू लागतो.हा क्रम मागील दोन आठवड्यांपाूसन या तलुक्यात बघायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेलने पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांची रोवणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. कित्येकांची रोवणी आटोपली आहे. परंतु वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आणखी किती दिवस दमदार पावसाची वाट बघावी लागेल हे सांगता येत नाही.हवामान खात्याचा अंदाज फोलयंदा समाधानकारक पाऊस पडेल किंवा अपेक्षेपेक्षा जास्त ही पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु सध्याची स्थिती पाहून असे वाटते की हवामान खात्याचे भाकीत निरर्थक ठरणार असून याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST
दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवीत होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते. त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी परत येतो.
शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा
ठळक मुद्देवरूण राजाकडे पावसाची हाक : पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या