शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कर्ज वसुलीच्या तगाद्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: February 20, 2015 01:18 IST

दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे

रावणवाडी : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक झाली आहे. अशातच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज कोणत्या रुपात फेडावे अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच त्यांच्याकडून कर्जवसुलीचा तगादा सुरू आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची लागवड, बियाणे, खत आदी खर्चासाठी विविध कार्यकारी संस्था, कोकण ग्रामीण बँक, पतसंस्था आदी यंत्रणेकडून कर्जाची उचल केली. मात्र या भागात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे पाण्याअभावी लागवड केलेले धान पिक शेतातच गडप झाले. गतवर्षी अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रत्येक वर्षीच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाले. अशातच वित्तीय मदत करणाऱ्या यंत्रणा ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून चलअचल संपत्ती जप्तीची कारवाई करण्याचा इशारा शेतकऱ्यांना देत आहे. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. यावर्षी खरीप हंगाम उशीरा सुरू झाला, त्यातच शेतकऱ्यांनी अल्पशा वेळात रोपे तयार केली. मात्र पिक हाती येण्याच्या शेवटी पावसाने हुलकावणी दिली. पिक वाचविण्याची शेतकऱ्यांना धडपड करावी लागली. मात्र पुरेशे उत्पन्न हाती आले नाही. एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे संस्था, बँकांचा कर्ज वसुलीचा तगादा या मोठ्या संकटामुळे शेतकऱ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. (वार्ताहर)